T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?

| Updated on: Oct 31, 2021 | 11:52 PM

आधी पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्याने भारताची विश्वचषकातील अवस्था बिकट झाली आहे. सेमीफायनलमध्ये भारताचं पोहचणं अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नाही.

1 / 5
T20 World Cup 2021 मध्ये भारताचं खराब प्रदर्शन पाहून सर्वचजण हैराण आहेत. आधी पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडकडून मात मिळाल्यामुळे भारताचं पुढील फेरीत पोहचणं जवळपास अशक्य झालं आहे.

T20 World Cup 2021 मध्ये भारताचं खराब प्रदर्शन पाहून सर्वचजण हैराण आहेत. आधी पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडकडून मात मिळाल्यामुळे भारताचं पुढील फेरीत पोहचणं जवळपास अशक्य झालं आहे.

2 / 5
भारताने सलग दोन मॅच गमावल्यामुळे गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर गेला आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताचं पोहोचणं अवघड झालं असलं तरी क्रिकेट हा एक खेळ असल्याने यामध्ये काहीही होऊ शकतं.

भारताने सलग दोन मॅच गमावल्यामुळे गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर गेला आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताचं पोहोचणं अवघड झालं असलं तरी क्रिकेट हा एक खेळ असल्याने यामध्ये काहीही होऊ शकतं.

3 / 5
भारताचे पुढील सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबिया या संघाविरुद्ध आहेत. या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट-रनरेट खूप वाढवावा लागेल. किमान 100 धावांच्या फरकाने सामने जिंकणे भारताला गरजेचे आहे.

भारताचे पुढील सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबिया या संघाविरुद्ध आहेत. या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट-रनरेट खूप वाढवावा लागेल. किमान 100 धावांच्या फरकाने सामने जिंकणे भारताला गरजेचे आहे.

4 / 5
दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ  स्कॉटलंड आणि नामीबिया संघाविरुद्ध अगदी छोट्या फरकाने पराभूत होणं गरजेचं आहे.

दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ स्कॉटलंड आणि नामीबिया संघाविरुद्ध अगदी छोट्या फरकाने पराभूत होणं गरजेचं आहे.

5 / 5
तसचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडला अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागणं गरजेचं आहे. हे सार फार अवघड असलं तरी हा खेळ असल्याने काहीही होऊ शकतं हे नक्की.

तसचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडला अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागणं गरजेचं आहे. हे सार फार अवघड असलं तरी हा खेळ असल्याने काहीही होऊ शकतं हे नक्की.