AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | जिंकलो, पण शार्दुल ठाकूरसाठी दिग्गज खेळाडूच बलिदान कधीपर्यंत द्यायच?

IND vs AUS | टीम इंडियाने मॅच जिंकली. पण एका खेळाडूंने टेन्शन दिलं आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच मोठ नुकसान होऊ शकतं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली वनडे जिंकलो. पण शार्दुल ठाकूरने अपेक्षित प्रदर्शन केलं नाही.

IND vs AUS |  जिंकलो, पण शार्दुल ठाकूरसाठी दिग्गज खेळाडूच बलिदान कधीपर्यंत द्यायच?
IND vs AUS 1st ODIImage Credit source: BCCI
| Updated on: Sep 23, 2023 | 8:38 AM
Share

मोहाली : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये दमदार सुरुवात केली आहे. वर्ल्ड कपआधी होणाऱ्या या वनडे सीरीजकडे वॉर्मअप म्हणून पाहिलं जात आहे. टीम मॅनेजमेंट आणि काही खेळाडूंसाठी या सीरीजच वेगळं महत्त्व आहे. या सीरीजमधील प्रदर्शनावर सगळ्यांची नजर असेल. मोहालीमध्ये टीम इंडियाने अपेक्षेनुसार प्रदर्शन केलं. पण एका खेळाडूंची कामगिरी नक्कीच चिंतेचा विषय आहे. मोहालीमधील पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि काही प्रमुख खेळाडू प्लेइंग 11 मध्ये नव्हते. या खेळाडूंना पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी आराम देण्य़ात आलाय, या दिग्गजांशिवाय टीम इंडिया कशी कामगिरी करणार हे महत्त्वाच आहे. ज्या खेळाडूंना वर्ल्ड कपच्या स्क्वाडमध्ये निवडलय त्यांना स्वत:ला सिद्ध करावं लागेल. बहुतांश आघाड्यांवर टीम इंडियाचा परफॉर्मन्स उजवा होता. पण एका खेळाडूंच्या कामगिरीमुळे टेन्शन आहे.

सर्वप्रथम शार्दुल ठाकूर. मीडियम पेस गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी ही शार्दुलची खासियत आहे. 2019 च्या वर्ल्ड कपनंतर शार्दुल वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. ऑलराऊंडर असल्यामुळे शार्दुल ठाकूरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळतं. त्यासाठी काहीवेळा मोहम्मद शमीला बाहेर बसवलं जातं. मागच्या काही सामन्यात शार्दुलने अपेक्षित कामगिरी केलेली नाही. मोहालीमध्ये शार्दुल महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 ओव्हरमध्ये 78 धावा देऊन एकही विकेट काढला नाही. अशावेळी मुख्य वेगवान गोलंदाजाच्या जागी शार्दुलचा टीममध्ये समावेश करणं कितपत योग्य आहे?. दिग्गज खेळाडूच बलिदान कधीपर्यंत?

शार्दुल ठाकूर खराब प्रदर्शन करतोय. पण त्याचवेळी मोहम्मद शमीने आपल्या जबरदस्त कामगिरीने टीम इंडियासमोर प्रश्न निर्माण केलाय. टीमची फलंदाजी भक्कम होते, म्हणून शार्दुल ठाकूरला सातत्याने खेळवलं जातय. आशिया कपमध्ये शामीला बाहेर बसाव लागलं. शमीला जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने कमालीची कामगिरी केलीय. मोहालीमध्ये शमीने 10 ओव्हरमध्ये 51 धावा देऊन 5 विकेट काढल्या. टीम इंडिया जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना सातत्याने खेळवत आहे. अशा प्रदर्शनानंतर शमीकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य होईल. ही चूक वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला भारी पडू शकते.

Follow Us
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...