AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG सेमीफायनलवेळी पाऊस पडला, तर कसा लागणार निकाल? जाणून घ्या नियम

IND vs ENG: सेमीफायनल आणि फायनलसाठी आयसीसीने काय वेगळे नियम बनवलेत.

IND vs ENG सेमीफायनलवेळी पाऊस पडला, तर कसा लागणार निकाल? जाणून घ्या नियम
T20 World Cup Final : फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास, कोणता संघ विजेता ठरेल ? Image Credit source: twitter
| Updated on: Nov 08, 2022 | 2:42 PM
Share

एडिलेड: ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी 20 वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. टीम इंडिया दिमाखात सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध होणार आहे. एडिलेड ओव्हलच्या मैदानात ही मॅच होईल. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये एका गोष्टीमुळे सातत्याने बाधा निर्माण झालीय. तो म्हणजे पाऊस. पावसाने यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधली अनेक समीकरणं बिघडवली आहेत.

वेगळे नियम बनवलेत का?

सुपर 12 राऊंडमध्ये पावसामुळे काही सामने रद्द झाले. त्यामुळे दोन्ही टीम्सना विभागातून 1-1 पॉइंट द्यावा लागला. पावसामुळे सेमीफायनल गाठण्याची समीकरण बदलली. काही सामन्यात पाऊस हिरो तर काही सामन्यात खलनायक ठरला. आता याच पावसामुळे सेमीफायनलच गणित सुद्धा बिघडणार का? आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी काही वेगळे नियम बनवलेत का? ते जाणून घेऊया.

आता सुपर 12 चा नियम नाही

सुपर 12 साठी जे नियम होते, त्यानुसार पावसामुळे सामना झाला नाही, तर पॉइंटसची समसमान विभागणी व्हायची. दोन्ही टीम्सना एक-एक पॉइंट दिला जायचा. पण आता सेमीफायनल आणि फायनलच्यावेळी पाऊस झाला तर काय?

कमीत कमी 10 ओव्हर्सचा खेळ गरजेचा

आयसीसीने दोन्ही सेमीफायनल आणि फायनलसाठी रिजर्व डे ठेवला आहे. म्हणजे पावसामुळे सामना सुरु झाला नाही, तर दुसऱ्यादिवशी सामना होईल. सामन्यादरम्यान पाऊस झाला, तर दोन्ही इनिंग्समध्ये पाच-पाच ओव्हरचा खेळ होण्याची वाट पाहिली जाणार नाही. सेमीफायनल आणि फायनलसाठी दोन्ही इनिंग्समध्ये कमीत कमी 10 ओव्हर्सचा खेळ गरजेचा आहे. असं झालं नाही, तर मॅच रिजर्व डे च्या दिवशी सुरु होईल.

13 नोव्हेंबरला फायनल

टी 20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल सिडनीत 9 नोव्हेंबरला होईल. दुसरी सेमीफायनल 10 नोव्हेंबरला एडिलेड ओव्हलमध्ये होईल. वर्ल्ड कपची फायनल 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात होईल. भारतीय वेळेनुसार, दुपारी 1.30 वाजता फायनल सुरु होईल.

या चार टीम्स सेमीफायनलमध्ये

न्यूझीलंड, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान या चार टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत. उद्या बुधवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये सेमीफायनलचा पहिला सामना होईल. त्यानंतर भारत आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनल मॅच खेळली जाईल.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?