IND vs SA : श्रेयस अय्यरची ‘ही’ चूक ठरली भारताच्या अपयशाचं कारण, टीम इंडिया इतिहास रचण्यात अपयशी, जाणून घ्या पराजयाची कारणं…

| Updated on: Jun 10, 2022 | 6:58 AM

मिलरने 31 चेंडूत नाबाद 64धावा केल्या. यात 4 चौकार आणि 5 षटकार आहेत.

IND vs SA : श्रेयस अय्यरची ही चूक ठरली भारताच्या अपयशाचं कारण, टीम इंडिया इतिहास रचण्यात अपयशी, जाणून घ्या पराजयाची कारणं...
श्रेयस अय्यर
Image Credit source: social
Follow us on

मुंबई :  काल भारतीय संघ (IND) इतिहास रचण्यात अपयशी ठरला आणि टी 20मध्ये दक्षिण अफ्रिकेनं (SA) भारतावर 7 गडी राखून विजय मिळवलाय. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात किलर मिलर आणि रासी व्हॅन डर ड्युसेन चमकले. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर भारताच्या पराभवात विलिन ठरलाय. टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना 211 धावांची मोठी मजल मारली. डेव्हिड मिलर आणि वेन डर ड्युसेन यांच्या खेळीमुळे पाहुण्या संघाला पाच चेंडू बाकी असताना लक्ष्याचा पाठलाग करता आला. भारताने दक्षिण आफ्रिकेला (IND vs SA) विजयासाठी 212 धावांचं विशाल लक्ष्य दिलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेने आरामात हे टार्गेट पार केलं. डेविड मिलर (David Miller) आणि रासी वॅन डर डुसे (Rassie van der Dussen) दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे नायक ठरले.

सामन्यात नेमकं काय झालं?

डेव्हीड आणि रासी वॅन डर डुसे या दोघांनी भारताच्या एकाही गोलंदाजाला दाद दिली नाही. अत्यंत सहजपणे त्यांनी भारताची गोलंदाजी फोडून काढली. मिलरने 31 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. यात 4 फोर आणि 5 सिक्स आहेत. डुसे 46 चेंडूत नाबाद 75 धावा तडकावल्या. यात 7 चौकार आणि 5 षटकार आहेत. आधी डेव्हिड मिलरने किलर अंदाज दाखवला. त्यानंतर डुसे भारतीय बॉलर्सवर तुटून पडला. आवेश खानच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने मिडविकेटला डुसेचा झेल सोडला. तो भारताला खूपच महाग पडला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 131 धावांची भागीदारी केली. डुसे-मिलर जोडीने मैदानावर फोर, सिक्सचा पाऊस पडला. दोघांना कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करायची हा भारतीय गोलंदाजांना प्रश्न पडला होता.

हे सुद्धा वाचा

श्रेयसची ही चूक पडली महागात

15व्या षटकापर्यंत सामना सुरू होता. दक्षिण आफ्रिकेनं 3 गडी गमावून 148 धावा केल्या होत्या आणि विजयापासून अजूनही 63 धावा दूर होत्या. यावेळी डेव्हिड मिलरनं 50 चेंडूत 29 आणि ड्युसेननं 30 चेंडूत 30 धावा केल्या. 16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ड्युसेननं हात उघडण्याचा प्रयत्न केला आणि मिड-विकेटच्या दिशेनं एक शॉट खेळला. तिथं असलेल्या श्रेयस अय्यरनं एक साधा झेल सोडला आणि इथून टीम इंडियाच्या पराभवाची सुरुवात सुरू झाली. डुसेननं याचा पुरेपूर फायदा घेतला आणि पुढच्या 15 चेंडूत 45 धावा केल्या. डुसेननं 46 चेंडूंत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 75 धावा केल्या. श्रेयस अय्यरच्या या चुकीमुळे सलग 13 टी-20 सामने जिंकून इतिहास रचण्यात भारताला मुकावं लागलं.

ड्युसेनशिवाय डेव्हिड मिलरनंही दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मिलरनं भारताविरुद्धच्या या सामन्यात 22 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 31 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वर्षानंतर मिलरचा किलर फॉर्म पाहायला मिळाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना 12 जून रोजी कटक येथे खेळवला जाणार आहे.