भारताचे तीन दिग्गज जे शेवटच्या मॅचमध्ये शून्यावर आऊट, दुसरा खेळाडू टीममधील हुकमी एक्का
क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी अनेक रेकॉर्ड रचले आहेत. मात्र काही खेळाडू असे आहेत की त्यांच्या करियरमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये ते शून्यावर आऊट झाले. भारतातील असे तीन क्रिकेटपटू ज्यांच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली, कोण आहेत ते जाणून घ्या.

संपूर्ण करियरमध्ये दमदार कामगिरी करणारे भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली. भारताचेच नाहीतर जगातीलही दिग्गज खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर भारताचे माजी खेळाडू यशपाल शर्मा आहेत. 1983 मध्ये यशपाल शर्मा वेस्ट इंडिजविरूद्धच्या आपल्या करियरच्या शेवटच्या सामन्यामध्ये शून्यावर आऊट झाले.

दुसऱ्या क्रमांकावर भारताचा स्टार खेळाडू सुरेश रैना आहे. 2015 मध्ये आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर आऊट झाला. सुरेश रैनाने शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळला होता.

भारताचा माजी खेळाडू मुरली विजयचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो. कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. मुरली विजयने 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

या यादीमध्ये हाशिम अमला (दक्षिण अफ्रीका), माइकल वॉन (इंग्लंड) ,एंड्रयू साइमंड्स (ऑस्ट्रेलिया), शोएब मलिक (पाकिस्तान) आणि मार्लोन सैम्युल्स (वेस्ट इंडिज) यांचाही समावेश