टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. भारत हा सुपर 12 मध्ये असून सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यात भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. पण तत्पूर्वी सराव म्हणून भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत भिडणार आहे. यातील पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. त्यानंतर आता दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध परार पडला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली ऑस्ट्रेलियाने 152 धावा केल्या. ज्या भारताने केवळ एक विकेट गमावत पूर्ण करत 9 विकेटने दांडगा विजय मिळवला आहे.
केएल राहुल बाद झाल्यानंतर रोहितने धुरा सांभाळत नाबाद 60 धावा केल्या तर पण नंतर स्वत:हून विश्रांती घेत तो तंबूत गेला. ज्यानंतर सूर्या आणि हार्दीकने अनुक्रमे 38 आणि 14 धावा करत विजय भारताच्या नावे केला.
भारताचा सलामीवीर केएल राहुल 39 धावा करुन बाद झाला आहे. आता रोहितच्या जोडीला सूर्यकुमार फलंदाजीला आला आहे.
भारतीय संघाने दमदार सुरुवात केली असून सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी क्रिजवर येत धमाल करण्यास सुरुवात केली आहे. 8 षटकानंतर भारताची धावसंख्या 62 वर 0 बाद अशी आहे.
ऑस्ट्रेलियाचा डाव एकहाती सांभाळणारा ग्लेन मॅक्सवेल राहुल चाहरच्या चेंडूवर बाद झाला आहे.
सध्या ऑस्ट्रेलियाचे अनुभवी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ दोघे क्रिजवर आहेत. तीन विकेट लवकर गेल्यानंतर या दोघांनी ऑसीसचा डाव सांभाळला आहे.
काय पाहावं ते नवलंच! या सराव सामन्यात आज कर्णधार कोहली गोलंदाजी करत आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचही बाद झाला आहे. रवींद्र जाडेजाने त्याला पायचीत केलं आहे.
भारताचा अनुभवी फिरकीपटू आर आश्विनने कमाल करत एकाच षटकात दोन महत्त्वाचे विकेट मिळवले आहेत. त्याने डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या दोघांना बाद केलं आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह हे विश्रांती करत आहेत.
सामन्याला सुरुवात झाली असून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडल्यामुळे त्यांचे सलामीवीर मैदानात आले आहेत.