AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: भारत वि न्यूझीलंड पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द

IND vs NZ: वेलिंग्टन येथे भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना होणार होता.

IND vs NZ: भारत वि न्यूझीलंड पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द
ind vs nz
| Updated on: Nov 18, 2022 | 2:03 PM
Share

वेलिंग्टन: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये शुक्रवारी वेलिंग्टन येथे पहिला टी 20 सामना होणार होता. पण या सामन्यावर पावसाने पाणी फिरवलं आहे. पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही. बराचवेळ प्रतिक्षा केल्यानंतर मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेलिंग्टनध्ये टॉसच्यावेळी पाऊस सुरु झाला. त्यानंतर दोन्ही टीम्सने प्लेयर इंडोर फुटबॉल खेळताना दिसले.

पावसामुळे पाणी भरलं

एकवेळ असं वाटत होतं की, पाऊस थांबेल आणि खेळ सुरु होईल. पण पावसाने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. पाऊस थांबणं दूर पण कमी सुद्धा झाला नाही. पावसामुळे स्टेडियमच्या बाहेर काही जागांवर पाणी भरलं.

बोर्ड बदलाचा विचार करतय

पहिल्या टी 20 सामन्यावर सगळ्यांच लक्ष होतं. कारण दोन्ही टीम्सचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला होता. न्यूझीलंडचा पाकिस्तानने पराभव केला. टीम इंडियाला इंग्लंडने 10 विकेटने पराभूत केलं. टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यानंतर बोर्ड टीम इंडियाच्या टी 20 टीममध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा विचार करत आहे.

युवा प्लेयर्सवर सगळ्यांच्या नजरा

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. युवा खेळाडूंना संधी दिलीय. शुभमन गिल, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, हर्षल पटेलवर सगळ्यांच्या नजरा आहेत.

गिलची प्रतिक्षा लांबली

शुभमन गिल टी 20 मध्ये डेब्यू करणार होता. पण पावसाने त्याची प्रतिक्षा अजून लांबवली. केएल राहुलच्या अनुपस्थितीत फॅन्सना शुभमन गिलला ओपनिंग करताना बघायचं होतं. पण वेलिंग्टनमध्ये असं होऊ शकलं नाही. भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन टी 20 सामन्याच्या सीरीजचा दुसरा सामना 20 नोव्हेंबरला होईल.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.