AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: भारत वि न्यूझीलंड पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द

IND vs NZ: वेलिंग्टन येथे भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना होणार होता.

IND vs NZ: भारत वि न्यूझीलंड पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द
ind vs nz
| Updated on: Nov 18, 2022 | 2:03 PM
Share

वेलिंग्टन: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये शुक्रवारी वेलिंग्टन येथे पहिला टी 20 सामना होणार होता. पण या सामन्यावर पावसाने पाणी फिरवलं आहे. पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही. बराचवेळ प्रतिक्षा केल्यानंतर मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेलिंग्टनध्ये टॉसच्यावेळी पाऊस सुरु झाला. त्यानंतर दोन्ही टीम्सने प्लेयर इंडोर फुटबॉल खेळताना दिसले.

पावसामुळे पाणी भरलं

एकवेळ असं वाटत होतं की, पाऊस थांबेल आणि खेळ सुरु होईल. पण पावसाने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. पाऊस थांबणं दूर पण कमी सुद्धा झाला नाही. पावसामुळे स्टेडियमच्या बाहेर काही जागांवर पाणी भरलं.

बोर्ड बदलाचा विचार करतय

पहिल्या टी 20 सामन्यावर सगळ्यांच लक्ष होतं. कारण दोन्ही टीम्सचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला होता. न्यूझीलंडचा पाकिस्तानने पराभव केला. टीम इंडियाला इंग्लंडने 10 विकेटने पराभूत केलं. टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यानंतर बोर्ड टीम इंडियाच्या टी 20 टीममध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा विचार करत आहे.

युवा प्लेयर्सवर सगळ्यांच्या नजरा

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. युवा खेळाडूंना संधी दिलीय. शुभमन गिल, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, हर्षल पटेलवर सगळ्यांच्या नजरा आहेत.

गिलची प्रतिक्षा लांबली

शुभमन गिल टी 20 मध्ये डेब्यू करणार होता. पण पावसाने त्याची प्रतिक्षा अजून लांबवली. केएल राहुलच्या अनुपस्थितीत फॅन्सना शुभमन गिलला ओपनिंग करताना बघायचं होतं. पण वेलिंग्टनमध्ये असं होऊ शकलं नाही. भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन टी 20 सामन्याच्या सीरीजचा दुसरा सामना 20 नोव्हेंबरला होईल.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....