IPL 2021 : 2015 नंतर पहिल्यांदाच विराट ‘असा’ झाला बाद, युवा खेळाडूच्या चपळाईसमोर कोहली हतबल

| Updated on: Sep 30, 2021 | 11:30 AM

ग्लेन मॅक्सवेल, युजवेंद्र चहल आणि शाहबाज अहमद या फिरकी जोडीच्या कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021) मध्ये आपले तिसरे स्थान अधिक मजबूत केले आहे.

1 / 5
ग्लेन मॅक्सवेल, युजवेंद्र चहल आणि शाहबाज अहमद या फिरकी जोडीच्या कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021) मध्ये आपले तिसरे स्थान अधिक मजबूत केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान पक्के केले आहे. बुधवारी दुबईत खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या चॅलेंजर्सनी 17 चेंडू राखून सामना जिंकला. पण या सामन्यात जगातील सर्वोत्तम धावपटू क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या आरसीबीचा कर्णधार धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

ग्लेन मॅक्सवेल, युजवेंद्र चहल आणि शाहबाज अहमद या फिरकी जोडीच्या कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021) मध्ये आपले तिसरे स्थान अधिक मजबूत केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान पक्के केले आहे. बुधवारी दुबईत खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या चॅलेंजर्सनी 17 चेंडू राखून सामना जिंकला. पण या सामन्यात जगातील सर्वोत्तम धावपटू क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या आरसीबीचा कर्णधार धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

2 / 5
विकेट्सच्या दरम्यान वादळासारखा धावणारा कोहली राजस्थान रॉयल्सच्या रियान परागसमोर हतबल झाला. विराट धावबाद होणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. आयपीएलमध्ये तो राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 2015 नंतर पहिल्यांदाच धावबाद झाला. परागच्या चपळाईसमोर खुद्द कोहली हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.

विकेट्सच्या दरम्यान वादळासारखा धावणारा कोहली राजस्थान रॉयल्सच्या रियान परागसमोर हतबल झाला. विराट धावबाद होणे ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. आयपीएलमध्ये तो राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 2015 नंतर पहिल्यांदाच धावबाद झाला. परागच्या चपळाईसमोर खुद्द कोहली हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.

3 / 5
आरसीबीच्या डावाच्या 7 व्या षटकात कोहलीने ख्रिस मॉरिसचा चेंडू हलक्‍या हातांनी खेळला. आधी पॉईंटवर चेंडू मिसफील्ड झाला.  पण लगेच रियानने चेंडू अडवून विजेच्या वेगाने नॉन स्ट्राइकिंग एंडवर पूर्ण जोर देऊन थ्रो केला. विराटही वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात होता, परंतु परागच्या थ्रोचा वेग कोहलीपेक्षा जलद होता, त्यामुळे विराट क्रीजवर पोहोचण्याआधीच परागने यष्ट्या उडवल्या होता.

आरसीबीच्या डावाच्या 7 व्या षटकात कोहलीने ख्रिस मॉरिसचा चेंडू हलक्‍या हातांनी खेळला. आधी पॉईंटवर चेंडू मिसफील्ड झाला. पण लगेच रियानने चेंडू अडवून विजेच्या वेगाने नॉन स्ट्राइकिंग एंडवर पूर्ण जोर देऊन थ्रो केला. विराटही वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात होता, परंतु परागच्या थ्रोचा वेग कोहलीपेक्षा जलद होता, त्यामुळे विराट क्रीजवर पोहोचण्याआधीच परागने यष्ट्या उडवल्या होता.

4 / 5
परागचा वेग पाहून कोहली आश्चर्यचकित झाला. हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवण्यात आला. अंतिम निर्णय थर्ड अंपायरने दिला आणि कोहलीने मायक्रो सेकंदांच्या अंतराने आपली विकेट गमावली होती. कोहलीने 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. गंमतीची गोष्ट म्हणजे त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रियान परागने पॉइंटवरच कोहलीचा झेल सोडला होता.

परागचा वेग पाहून कोहली आश्चर्यचकित झाला. हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवण्यात आला. अंतिम निर्णय थर्ड अंपायरने दिला आणि कोहलीने मायक्रो सेकंदांच्या अंतराने आपली विकेट गमावली होती. कोहलीने 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. गंमतीची गोष्ट म्हणजे त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रियान परागने पॉइंटवरच कोहलीचा झेल सोडला होता.

5 / 5
राजस्थानच्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि पडिक्कल यांनी संघाला झटपट सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. आयपीएलमध्ये 5 व्या वेळी, आरसीबी संघ पॉवरप्लेमध्ये 50 प्लस धावा करण्यात यशस्वी झाला. या फास्ट स्टार्टमुळे संघाचा विजय निश्चित झाला. विराट आणि पडिक्कलने संघाला चांगली सुरुवात दिली, तर मॅक्सवेल आणि भरतच्या भागीदारीने त्यावर विजयाची इमारत उभी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूत 69 धावा जोडल्या. भरत 44 धावा करून बाद झाला. मॅक्सवेल 30 चेंडूत 50 धावांवर नाबाद राहिला.

राजस्थानच्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि पडिक्कल यांनी संघाला झटपट सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. आयपीएलमध्ये 5 व्या वेळी, आरसीबी संघ पॉवरप्लेमध्ये 50 प्लस धावा करण्यात यशस्वी झाला. या फास्ट स्टार्टमुळे संघाचा विजय निश्चित झाला. विराट आणि पडिक्कलने संघाला चांगली सुरुवात दिली, तर मॅक्सवेल आणि भरतच्या भागीदारीने त्यावर विजयाची इमारत उभी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूत 69 धावा जोडल्या. भरत 44 धावा करून बाद झाला. मॅक्सवेल 30 चेंडूत 50 धावांवर नाबाद राहिला.