AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर विराट कोहली याला आठवलं आपलं षटक, असाच गमावला होता सामना Watch Video

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही सामना कोण जिंकेल? असाच काहीसा सामना हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात झाला. पण विराट कोहलीची जखम मात्र ओली झाली.

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर विराट कोहली याला आठवलं आपलं षटक, असाच गमावला होता सामना Watch Video
Video: राजस्थान रॉयल्सचा पराभवानंतर विराट कोहलीची मनस्थिती बिघडली! 4042 दिवसांपूर्वी असंच काही घडलं होतं Image Credit source: AFP
| Updated on: May 08, 2023 | 1:08 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रोमहर्षक सामन्यांची मेजवानी क्रीडारसिकांना मिळत आहे. काही विजय तर तोंडात बोटं घालायला लावणारे आहेत. रिंकु सिंहने शेवटच्या षटकात सलग 5 षटकार मारून असाच विजय मिळवून दिला होता. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोण बाजी मारेल? सांगता येत नाही. असंच काहीसं सनराईजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स सामन्यात पाहायला मिळालं. राजस्थानने आक्रमक फलंदाजी करत 20 षटकात 2 गडी गमवून 214 धावा केल्या आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सनराईजर्स हैदराबादनं शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. पण सामना राजस्थाननं गमवला असला तरी विराट कोहलीची जखम मात्र ताजी झाली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचा 18 व्या षटकापर्यंत विजय निश्चित होता. पण शेवटच्या दोन षटकांमुळे सामन्याचं चित्रच पालटलं. हैदराबादच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहलीची आठवण क्रीडा रसिकांना पडली आहे. कारण असंच काहीसं विराट कोहलीसोबत झालं होतं.आजपासून 4042 दिवसांपूर्वी आरसीबीसोबत झालं होतं. या पराभवासाठी विराट कोहली जबाबदार होता.

12 एप्रिल 2012 रोजी म्हणजेच आजपासून 4042 दिवसांपूर्वी आरसीबीने राजस्थान-हैदराबादप्रमाणे सामना गमावला होता. समोर चेन्नई सुपर किंग्स संघ होता. त्यावेळेस चेन्नईला शेवटच्या दोन षटकात 43 धावा करायच्या होत्या. त्या वेळेस संघाची धुरा डेनियल विटोरीकडे होती. त्याने विराट कोहलीकडे 19 वं षटक सोपवलं.

विराट कोहलीच्या षटकाचा सामना करण्यासाठी समोर एल्बी मॉर्कल होता. त्याने विराटच्या षटकाची धुलाई केली. एका षटकात 28 धावा केल्या. विराटच्या षटकावर मॉर्कलने 3 षटकार आणि 2 चौकार ठोकले.

शेवटच्या दोन षटकात 43 धावा

विराट कोहलीने महागडं षटक टाकल्यानंतर आरसीबीला 15 धावा वाचवायच्या होत्या. पण मार्कल आणि जडेजा जोडीने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. म्हणजेच आरसीबीने शेवटच्या 2 षटकात 43 धावा दिल्या. आयपीएलच नाही तर टी 20 क्रिकेटमधला हा विक्रम आहे.

आरसीबी व्यतिरिक्त टी 20 ब्लास्टमध्ये ग्लूस्टरशर आणि या हंगामात गुजरात टायटन्सने शेवटच्या दोन षटकात 43-43 धावा दिल्या होत्या. तर राजस्थान रॉयल्सने शेवटच्या दोन षटकात 41 धावा दिल्या.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.