AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इरफान पठानने टीम इंडियाला सुचवला हुकूमी एक्क्याचा पर्याय, कोण आहे तो?

आशिया कप स्पर्धेत सुपर 4 राऊंडमध्ये टीम इंडियाला झटका बसला आहे. आधी पाकिस्तान त्यानंतर श्रीलंकेकडून टीम इंडियाचा पराभव झाला. खरंतर टीम इंडियाला विजेतेपदाच दावेदार समजल जात होतं.

T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इरफान पठानने टीम इंडियाला सुचवला हुकूमी एक्क्याचा पर्याय, कोण आहे तो?
irfan pathan family
| Updated on: Sep 07, 2022 | 8:42 PM
Share

मुंबई: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 राऊंडमध्ये टीम इंडियाला झटका बसला आहे. आधी पाकिस्तान त्यानंतर श्रीलंकेकडून टीम इंडियाचा पराभव झाला. खरंतर टीम इंडियाला विजेतेपदाच दावेदार समजल जात होतं. पण टीम इंडियाच आव्हान आता जवळपास संपुष्टात आलं आहे. आता दुसऱ्याटीमच्या निकालावर अवलंबून रहाव लागणार आहे.

तीन वेगवान गोलंदाज टीममध्ये होते

टीम इंडिया हरली त्याची अनेक कारणं आहेत. त्यातल एक मुख्य कारण म्हणजे टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांच निराशाजनक प्रदर्शन. ग्रुप स्टेजमध्ये तीन वेगवान गोलंदाज टीममध्ये होते. त्यानंतर रोहितने दोन स्पेशलिस्ट बॉलर आणि ऑलराऊंडरला प्राधान्य दिलं.

हे पराभवाच एक कारण

भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंह या तिघांनी धावा दिल्या. ते धावगतीला लगाम घालू शकले नाहीत. हे पराभवाच एक कारण आहे. दोन्ही सामन्यात पावरप्लेच्या पहिल्या सहा ओव्हर्समध्ये टीम इंडियाचे गोलंदाज विकेट काढू शकले नाहीत.

इरफान काय म्हणाला?

टीम इंडियाला दर्जेदार वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवली. इरफान पठानने मोहम्मद शमीच नाव सुचवलं आहे. नव्या चेंडूने गोलंदाजी करुन विकेट काढण्यात शमी तरबेज असल्याचं इरफान म्हणाला. “तुम्ही जो संघ निवडला, त्यात सहावा बॉलर निवडला नाही. पाच गोलंदाजांकडून तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. आता इथे वर्ल्ड कप टीममध्ये शमीचा समावेश करण्याची संधी आहे. तुम्ही नव्या चेंडूचा विचार करत असाल, तर मोहम्मद शमी इतका दुसरा चांगला पर्याय नाही” असं इरफान स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला.

शमी सर्वात पुढे ?

“आज अनेक गोलंदाज तुमच्यासमोर आहेत. अनेक पर्याय आहेत. पण ते तरुण आहेत. त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. अनुभव आणि फॉर्मचा विचार केला, तर मोहम्मद शमी या शर्यतीत पुढे आहे” असं इरफानने सांगितलं.

'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.