
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील नवव्या दिवशी अर्थात रविवारी 15 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. या सामन्याचे वेध चाहत्यांना लागले आहेत. या सामन्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. एका बाजूला या हायव्होव्टेज सामन्यासाठीची क्रिकेट वर्तुळात चर्चा पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या बाजूला स्पर्धेच्या आठव्या दिवशी 14 फेब्रुवारीला वर्ल्ड कपमधून पहिला संघ अधिकृतरित्या बाहेर झाला आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातून बाहेर होणारा पहिला संघ कोणता आहे? हे आपण जाणून घेऊयात.
ओमान क्रिकेट टीमचं टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलं आहे. ओमानने आयर्लंडवर मोठ्या फरकाने मात केली. ओमानचं या पराभवासह स्पर्धेतून पॅकअप झालं. शनिवारी 14 फेब्रुवारीला स्पर्धेतील 22 व्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध ओमान आमनेसामने होते. आयर्लंडने ओमानवर या सामन्यात 96 धावांच्या फरकाने विजय मिळवला.
आयर्लंडने ओमान विरुद्ध फटकेबाजी करत या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. आयर्लंडने 5 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या. त्यानंतर आयर्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली. आयर्लंडने ओमानला 12 बॉलआधी ऑलआऊट केलं. ओमानला 18 ओव्हरमध्ये 139 रन्सवर गुंडाळलं. आयर्लंडने अशाप्रकारे 96 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.
आयर्लंड आणि ओमान दोन्ही संघांनी या वर्ल्ड कपमधील आपले दोन्ही सामने गमावले होते. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा क्रिकेट सामना करो या मरो असा होता. त्यामुळे दोघांपैकी कोणता तरी एक संघ बाहेर होणार आणि कुणीतरी विजयाचं खातं उघडणार हे समीकरण निश्चित होतं. त्यामुळे या सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आयर्लंडने एकतर्फी विजय मिळवला आणि आपलं आव्हान कायम राखलं.
ओमानचा बाजार उठला
🇴🇲 Oman are the first team to be eliminated from the #T20WorldCup2026 pic.twitter.com/zdQRSNB2zA
— Cricbuzz (@cricbuzz) February 14, 2026
ओमानने अशाप्रकारे आतापर्यंत एकूण आणि सलग 3 सामने गमावले आहेत. ओमान या स्पर्धेत आपल्या मोहिमेतील चौथा आणि अंतिम सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 20 फेब्रुवारीला होणार आहे. तर आयर्लंड 17 फेब्रुवारीला आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना हा झिंबाब्वे विरुद्ध खेळणार आहे. झिंबाब्वेला हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये धडक देण्याची संधी आहे. अशात आता आयर्लंड सलग दुसरा सामना जिंकून झिंबाब्वेची सुपर 8 ची वाट बिकट करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.