AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘श्श्श! खेळपट्ट्यांबद्दल काही बोलायचं नाही’; PCB अध्यक्ष रमीझ राजांची समालोचकांना तंबी

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कराचीमध्ये (Karachi Test) खेळवला जात आहे. उभय संघांमध्ये खेळवल्या जात असलेल्या या मालिकेत खेळाच्या चर्चेपेक्षा खेळपट्टीनेच जास्त भाव खाल्लाय.

'श्श्श! खेळपट्ट्यांबद्दल काही बोलायचं नाही'; PCB अध्यक्ष रमीझ राजांची समालोचकांना तंबी
Ramiz Raja Image Credit source: File
| Updated on: Mar 14, 2022 | 4:00 PM
Share

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कराचीमध्ये (Karachi Test) खेळवला जात आहे. उभय संघांमध्ये खेळवल्या जात असलेल्या या मालिकेत खेळाच्या चर्चेपेक्षा खेळपट्टीनेच जास्त भाव खाल्लाय. रावळपिंडीनंतर आता कराचीच्या खेळपट्टीचा मूडही क्रिकेटपंडितांना खटकतोय. रावळपिंडी कसोटीनंतर खेळपट्टीवरून पाकिस्तानला जगभरातून फटकारले जात आहे. अनेक प्रश्न उपस्थित केले गेले, ज्यांचे उत्तर देणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कठीण झाले. आता कराचीच्या खेळपट्टीचा मूडही लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनत चालला आहे, अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) अॅक्शनमध्ये आले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रमीझ राजा यांनी कराची टेस्टमधील कॉमेंट्री पॅनलला खेळपट्टीबद्दल बोलू नका असे सांगितले आहे. खेळपट्टी कशी आहे या बद्दल न बोलण्याची तंबी दिली आहे. आता कसोटी सामना सुरू आहे आणि खेळपट्टीची चर्चाच होणार नाही तर खेळ पाहायला मजा कशी येईल. पण, आपल्या चुका, फसलेली स्ट्रॅटेजी हे सगळं लपवण्यासाठी पीसीबीने समालोचकांना खेळपट्टीबाबत काहीही बोलू नये, अशी तंबी दिली आहे.

रमीझ राजांकडून खेळपट्टीबद्दल बोलण्यास बंदी!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांनी खेळपट्टीबद्दल बोलण्यास मनाई करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी कराचीच्या कॉमेंट्री बॉक्समधील समालोचकांना खेळपट्टीबद्दल बोलण्यास मनाई केली. त्याआधी त्यांनी रावळपिंडीतही असाच फतवा काढला होता, असा दावा जिओ न्यूजच्या पत्रकाराने केला आहे.

रावळपिंडीची खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी योग्य नव्हती. याची सर्व जगाला कल्पना आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. या खेळपट्टीवर आयसीसीने कारवाईदेखील केली आहे.

रावळपिंडीनंतर कराचीच्या खेळपट्टीबाबतही प्रश्न!

रावळपिंडीच्या चुकीनंतर पाकिस्तान धडा घेईल आणि कराचीमध्ये चांगली खेळपट्टी तयार करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. त्यानंतर उभय संघांमध्ये एक चांगली लढत होईल असा विचार करुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कराचीत चांगली खेळपट्टी बनवेल, असं अनेकांना वाटत होतं मात्र पाकिस्तान बोर्डाने पुन्हा आपल्या चुकीची पुनरावृत्ती केली आहे. कराचीच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने 9 बाद 556 धावा करून पहिला डाव घोषित केला.

इतर बातम्या

ICC WWC 2022: पुरुषांनाही लाजवतील असे दोन झेल आणि रनआऊट, ‘या’ महिला क्रिकेटपटूंनी अचाट कामगिरी, पहा VIDEO

ICC WWC 2022: न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवून ऑस्ट्रेलियाची विजयी हॅट्ट्रिक

IND W vs WI W: मिताली राज, स्मृती मानधना जबाबदारी कधी घेणार? कोच रमेश पोवार म्हणाले…

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.