AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्माने दिलं असं उदाहरण, म्हणाला…

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवला आहे. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी आणि अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माने एक उदाहरण दिलं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्माने दिलं असं उदाहरण, म्हणाला...
| Updated on: Oct 20, 2024 | 3:05 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 साखळीतील कसोटी मालिका सुरु आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने आपल्या खिशात घातला. न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर मालिकेत कमबॅकसाठी टीम इंडियाची धडपड असणार आहे. उर्वरित दोन सामन्यात टीम इंडिया कशी कमागिरी करते याकडे लक्ष लागून आहे. मालिका विजयासोबत टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित उर्वरित दोन सामन्यांवर अवलंबून आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर उर्वरित दोन सामन्यांबाबत सांगताना इंग्लंड मालिकेचं उदाहरण दिलं आहे. कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘आम्ही हा पराभव सकारात्मक घेऊन पुढे जाणार आहोत. आमच्या संघातील सहकाऱ्यांनी यापूर्वी अशी परिस्थिती हाताळली आहे. आम्ही इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना गमावला होता. त्यानंतर इतर चार सामन्यात अशी विजय मिळवला होता. आता या मालिकेतील दोन सामने शिल्लक आहेत. प्रत्येकाला या दोन सामन्यात काय करायचं आहे याचं भान आहे. आम्ही पुढच्या सामन्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि पुढे जाऊ.’

बंगळुरु कसोटी न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. यासह रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. महेंद्रसिंह धोनी, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरसह नको त्या पंगतीत बसला आहे.रोहित शर्मा घरच्या मैदानावर तीन कसोटी सामने गमवणारा पाचवा कर्णधार ठरला आहे. भारतीय भूमीत बिशनसिंह बेदी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनीने तीन सामने गमावले आहेत.दुसरीकडे, 36 वर्षांनंतर न्यूझीलंडने भारतीय भूमीवर कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने 1988 मध्ये भारतात शेवटचा कसोटी सामना जिंकला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 24 ऑक्टोबरला दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामन्यात पुण्यात होणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरला असणार आहे. त्यानंतर टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. या मालिकेत भारताची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.