AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्माने दिलं असं उदाहरण, म्हणाला…

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवला आहे. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी आणि अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माने एक उदाहरण दिलं आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्माने दिलं असं उदाहरण, म्हणाला...
| Updated on: Oct 20, 2024 | 3:05 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 साखळीतील कसोटी मालिका सुरु आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने आपल्या खिशात घातला. न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर मालिकेत कमबॅकसाठी टीम इंडियाची धडपड असणार आहे. उर्वरित दोन सामन्यात टीम इंडिया कशी कमागिरी करते याकडे लक्ष लागून आहे. मालिका विजयासोबत टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित उर्वरित दोन सामन्यांवर अवलंबून आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने न्यूझीलंडचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर उर्वरित दोन सामन्यांबाबत सांगताना इंग्लंड मालिकेचं उदाहरण दिलं आहे. कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘आम्ही हा पराभव सकारात्मक घेऊन पुढे जाणार आहोत. आमच्या संघातील सहकाऱ्यांनी यापूर्वी अशी परिस्थिती हाताळली आहे. आम्ही इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना गमावला होता. त्यानंतर इतर चार सामन्यात अशी विजय मिळवला होता. आता या मालिकेतील दोन सामने शिल्लक आहेत. प्रत्येकाला या दोन सामन्यात काय करायचं आहे याचं भान आहे. आम्ही पुढच्या सामन्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि पुढे जाऊ.’

बंगळुरु कसोटी न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. यासह रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. महेंद्रसिंह धोनी, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरसह नको त्या पंगतीत बसला आहे.रोहित शर्मा घरच्या मैदानावर तीन कसोटी सामने गमवणारा पाचवा कर्णधार ठरला आहे. भारतीय भूमीत बिशनसिंह बेदी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनीने तीन सामने गमावले आहेत.दुसरीकडे, 36 वर्षांनंतर न्यूझीलंडने भारतीय भूमीवर कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने 1988 मध्ये भारतात शेवटचा कसोटी सामना जिंकला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 24 ऑक्टोबरला दुसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामन्यात पुण्यात होणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरला असणार आहे. त्यानंतर टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. या मालिकेत भारताची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले