AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : खराब प्रकाशमानाने न्यूझीलंडला वाचवलं, नाहीतर भारताने घेतली असती आघाडी, भारतीय फलंदाजाने केला दावा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सध्या खेळत असलेल्या एका भारतीय फलंदाने तिसऱ्या दिवशीच्या खेळाबद्दल बोलताना एक महत्त्वाचा दावा केला आहे. खराब प्रकाशमानामुळे भारताच्या हातातून संधी निसटल्याचं त्याचं म्हणण आहे.

WTC Final : खराब प्रकाशमानाने न्यूझीलंडला वाचवलं, नाहीतर भारताने घेतली असती आघाडी, भारतीय फलंदाजाने केला दावा
Shubman-Gill
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 4:48 PM
Share

साऊदम्पटन : भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात केवळ 217 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान न्यूझीलंडकडून मात्र चांगल्या फलंदाजीचे दर्शन झाले असून सलामीवीर डेवन कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंड 49 ओव्हर नंतर 101 वर 2 बाद अशा मजबूत स्थितीत आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशीचा खेळ खराब प्रकाशमानामुळे थांबवण्यात आल्याने खराब प्रकाशमानामुळे न्यूझीलंड वाचले नाहीतर भारतीय गोलंदाजानी आणखी विकेट्स पटकावले असते असा दावा भारताचा सलामीवीर शुभमन गिलने केला आहे.(Shubman Gill Says In ICC World test Final due to Bad Light We did not got some wickets if Weather Was good We Will be in benifit)

तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने सामन्यावर चांगली पकड मिळवली. भारताचा पहिला डाव 217 धावांत गुंडाळून न्यूझीलंडने दमदार फलंदाजीला सुरुवात केली. दरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये शमीनेलॅथमचा विकेट घेतल्यावर देखील न्यूझीलंडचा सेट बॅट्समन कॉन्वे कर्णधार केनसोबत चांगली फलंदाजी करत होता. तेव्हाच इशांत शर्माने 49 व्या ओव्हरमध्ये कॉन्वेला बाद केले आणि भारताला ब्रेक थ्रू मिळाला. दोन्ही सेट फलंदाज तंबूत परतल्याने भारताला सामन्यात पुन्हा आघाडी घेण्याची संधी आली होती मात्र तेव्हाच खराब प्रकाशमानामुळे दिवसाचा खेळ वेळेपेक्षा लवकर थांबवण्यात आला.  याच गोष्टीमुळे न्यूझीलंडला फायदा आणि भारताला तोटा झाल्याचं भारतीय सलामीवीर शुभमन गिलने सामन्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

काय म्हणाला गिल

सामन्यानंतर शुभमन गिल पत्रकार परिषदेत म्हणाला की, “आम्ही दिवसाच्या शेवटी घेतलेला कॉन्वेचा विकेट अत्यंत महत्त्वाचा होता, जर आम्हाला काही आणखी ओव्हर गोलंदाजीसाठी भेटले असते तर आणकी विकेट्स घेण्यात आम्ही यशस्वी झालो असतो. ”

संबंधित बातम्या

WTC Final Weather Update : चौथ्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधील हवामानाचे ताजे फोटो समोर

WTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत

WTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात

(Shubman Gill Says In ICC World test Final due to Bad Light We did not got some wickets if Weather Was good We Will be in benifit)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली