AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : खराब प्रकाशमानाने न्यूझीलंडला वाचवलं, नाहीतर भारताने घेतली असती आघाडी, भारतीय फलंदाजाने केला दावा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सध्या खेळत असलेल्या एका भारतीय फलंदाने तिसऱ्या दिवशीच्या खेळाबद्दल बोलताना एक महत्त्वाचा दावा केला आहे. खराब प्रकाशमानामुळे भारताच्या हातातून संधी निसटल्याचं त्याचं म्हणण आहे.

WTC Final : खराब प्रकाशमानाने न्यूझीलंडला वाचवलं, नाहीतर भारताने घेतली असती आघाडी, भारतीय फलंदाजाने केला दावा
Shubman-Gill
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 4:48 PM
Share

साऊदम्पटन : भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात केवळ 217 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान न्यूझीलंडकडून मात्र चांगल्या फलंदाजीचे दर्शन झाले असून सलामीवीर डेवन कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंड 49 ओव्हर नंतर 101 वर 2 बाद अशा मजबूत स्थितीत आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशीचा खेळ खराब प्रकाशमानामुळे थांबवण्यात आल्याने खराब प्रकाशमानामुळे न्यूझीलंड वाचले नाहीतर भारतीय गोलंदाजानी आणखी विकेट्स पटकावले असते असा दावा भारताचा सलामीवीर शुभमन गिलने केला आहे.(Shubman Gill Says In ICC World test Final due to Bad Light We did not got some wickets if Weather Was good We Will be in benifit)

तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने सामन्यावर चांगली पकड मिळवली. भारताचा पहिला डाव 217 धावांत गुंडाळून न्यूझीलंडने दमदार फलंदाजीला सुरुवात केली. दरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये शमीनेलॅथमचा विकेट घेतल्यावर देखील न्यूझीलंडचा सेट बॅट्समन कॉन्वे कर्णधार केनसोबत चांगली फलंदाजी करत होता. तेव्हाच इशांत शर्माने 49 व्या ओव्हरमध्ये कॉन्वेला बाद केले आणि भारताला ब्रेक थ्रू मिळाला. दोन्ही सेट फलंदाज तंबूत परतल्याने भारताला सामन्यात पुन्हा आघाडी घेण्याची संधी आली होती मात्र तेव्हाच खराब प्रकाशमानामुळे दिवसाचा खेळ वेळेपेक्षा लवकर थांबवण्यात आला.  याच गोष्टीमुळे न्यूझीलंडला फायदा आणि भारताला तोटा झाल्याचं भारतीय सलामीवीर शुभमन गिलने सामन्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

काय म्हणाला गिल

सामन्यानंतर शुभमन गिल पत्रकार परिषदेत म्हणाला की, “आम्ही दिवसाच्या शेवटी घेतलेला कॉन्वेचा विकेट अत्यंत महत्त्वाचा होता, जर आम्हाला काही आणखी ओव्हर गोलंदाजीसाठी भेटले असते तर आणकी विकेट्स घेण्यात आम्ही यशस्वी झालो असतो. ”

संबंधित बातम्या

WTC Final Weather Update : चौथ्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधील हवामानाचे ताजे फोटो समोर

WTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत

WTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात

(Shubman Gill Says In ICC World test Final due to Bad Light We did not got some wickets if Weather Was good We Will be in benifit)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.