AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs IND: रोहितनंतर आता विराटही सज्ज; श्रीलंके विरूद्धच्या मालिकेत खेळणार! ‘गंभीर’ आवाहनाला प्रतिसाद

India Tour Of Sri Lanka: टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत उभयसंघात प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत.

SL vs IND: रोहितनंतर आता विराटही सज्ज; श्रीलंके विरूद्धच्या मालिकेत खेळणार! 'गंभीर' आवाहनाला प्रतिसाद
virat kohli gautam gambhir team india
| Updated on: Jul 18, 2024 | 4:59 PM
Share

टीम इंडियात नक्की चाललंय काय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना सध्याच्या घडामोडी पाहून पडलाय. वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाच्या प्रमु खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. युवा खेळाडूंनी झिंबाब्वेचा दौरा केला. त्यानंतर आता टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी20i आणि वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे या दौऱ्यातील एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हेड कोच गौतम गंभीर याच्या आवाहनानंतर दोघही खेळणार असल्याचं समोर आलं आहे.

विराट, रोहित आणि जसप्रीत बुमराह हे तिघे वनडे सीरिजमधून विश्रांती घेणार होते. मात्र गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच होताच एक्शन मोडमध्ये आलाय. टीम इंडियाला 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी खेळायची आहे. त्यासाठी टीम इंडियाकडे फक्त 10 एकदिवसीय सामनेच आहेत. त्यामुळे रोहित-विराट यासारख्या अनुभवी खेळाडूंनी वनडे सीरिजमध्ये खेळावं, अशी विनंती गंभीरने केली होती. त्यानुसार रोहित खेळणार असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता विराटनेही गंभीरच्या या विनंतीला मान देत तो खेळणार असल्याचं समोर आलं आहे. विविध मिडिया रिपोर्ट्सनुसार, विराट श्रीलंके विरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

टी 20 मालिकेचं काय?

टीम इंडिया टी 20 मालिकेने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव याची पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. कर्णधार म्हणून हार्दिक पंड्यापेक्षा सूर्याचं नाव आघाडीवर आणि जवळपास निश्चित आहे. तसेच या मालिकेसाठी युवा रियान पराग आणि ऋषभ पंत या दोघांचीही निवड केली जाणार असल्याचं म्हटलं जातंय. रियानने झिंबाब्वे दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.

टीम इंडियाच्या गोटातील घडामोडी!

टीम इंडियाची घोषणा केव्हा?

दरम्यान श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी 18 जुलै रोजी टीम इंडियाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार रोहित शर्मा वनडे आणि सूर्यकुमार यादव टी 20i मालिकेत नेतृत्व करणार आहेत. तसेच निवड समिती कोणत्या नवख्या खेळाडूंना संधी देते? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.