AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saurav Ganguly : विराट आणि रोहितच्या कामगिरीवर सौरव गांगुलींचं भाष्य, काय म्हणाले सौरव गांगुली?

बीसीसीआयचे अध्यक्ष सैरव गांगुली यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर भाष्य केलंय.

Saurav Ganguly : विराट आणि रोहितच्या कामगिरीवर सौरव गांगुलींचं भाष्य, काय म्हणाले सौरव गांगुली?
सौरव गांगुली, अध्यक्ष बीसीसीआयImage Credit source: twitter
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 29, 2022 | 5:34 PM
Share

मुंबई : विराट कोहली (Virat Kohali) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज खेळाडू आहेत. दोघेही आयपीएलमध्ये तरबेज खेळाडू म्हणूनच ओळखले जातात. काहींनी तर विराटला ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम म्हणून देखील रेट केलंय. मात्र, आयपीएलमध्ये विराट कोहली ज्या प्रकारे खेळत आहे. त्यावरुन त्याच्या कामगिरीवर चर्चा होतेय. आरसीबी संघाला त्याच्या फलंदाजीकडे लक्ष द्यावं लागणार आहे. विराट कोहलीच्या खराब फलंदाजीचा मोठा फटका या संघाला बसला आहे. जरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी असले तरी या संघाकडून आणखी चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. तर मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर बोलतानना रोहित शर्माविषयी आणि दुसरीकडे आरसीबीवर बोलताना विराट कोहलीविषयी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी भाष्य केलंय.

सौवर गांगुली काय म्हणालेत?

सौरव गांगुली रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर बोलताना म्हणाले की, ‘रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही महान खेळाडू आहेत. मला खात्री आही की ते पुन्हा फॉर्ममध्ये येतीलच. मला आशा आहे की ते लवकरच धावा काढण्यास सुरुवात करतील. विराट कोहलीच्या डोक्यात काय चाललंय. हे मला माहित नाही पण मला खात्री आहे की तो पुन्हा चांगली कामगिरी करणार. काही चांगल्या धावाही काढणार. विराट एक महान खेळाडू आहे.’

उमरान मलिकचं कौतुक

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावेळी बोलताना उमरान मलिकचं कौतुक केलंय. ‘कोणताही संघ जिंकू शकतो किंवा कोणताही संघ हरू शकतो. खेळताना जय परायज होणारच. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये प्रत्येक खेळाडू चांगला खेळत आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवे संघ चांगली कामगिरी करत आहेत. उमरान मलिकची गोलंदाजी लक्षवेधी ठरली आहे. उमेश यादव आणि खलील अहमदनेही चांगली गोलंदाजी केली आहे. मी म्हणेन की उमरान मलिक हा आतापर्यंत लीगचा उत्कृष्ट चेहरा आहे.

मुंबई संघाबद्दल चिंता का?

इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा 15 वा सीजन आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सचा संघ खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. पाच वेळचा चॅम्पियन संघ अजूनपर्यंत एकही मॅच जिंकू शकलेला नाही. सलग 8 सामन्यात पराभव झाला आहे. यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या या कामगिरीनंतर एक मोठा निर्णय घेतलाय. यातच आता धवल कुलकर्णी हा मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडमध्ये दाखल झाला आहे.

Follow Us
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ