AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: ‘मी कारण देणार…’, पराभवानंतर Rohit Sharma काय म्हणाला?

IND vs SA: पराभवाबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला....

IND vs SA: 'मी कारण देणार...', पराभवानंतर Rohit Sharma काय म्हणाला?
rohit sharmaImage Credit source: tv9marathi
| Updated on: Oct 30, 2022 | 9:05 PM
Share

पर्थ: टीम इंडियाचा आज टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला. टुर्नामेंटमधला टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. आज दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पाच विकेट राखून विजय मिळवला. दोन्ही टीमसाठी हा सामना महत्त्वाचा होता. कारण त्यामुळे सेमीफायनलचे दरवाजे उघडणार होते. दक्षिण आफ्रिकेची टीम आता ग्रुपमध्ये 5 पॉइंटसह टॉपवर आहे. त्याचवेळी टीम इंडिया 4 पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे.

सहजासहजी जिंकू दिलं नाही

दक्षिण आफ्रिकेने आजचा सामना जिंकला. पण भारताने त्यांना सहजासहजी जिंकू दिलं नाही. शेवटपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या टीमला झुंजवलं. अखेर शेवटचे 2 चेंडू बाकी असताना दक्षिण आफ्रिकेने विजय साकारला. एडन मार्कराम (52) आणि डेविड मिलर नाबाद (59) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“वातावरण बघता खेळपट्टीमध्ये काहीतरी असणार अशी आम्हाला अपेक्षा होती. वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल, 130 धावांचा पाठलाग करणं सोपं नव्हतं. आम्ही चांगले खेळलो. पण आमच्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेने सरस खेळ केला” असं रोहित शर्मा म्हणाला.

रोहितने प्रामाणिकपणे एक गोष्ट केली मान्य

“खेळपट्टी अशी होती की, वेगवान गोलंदाजांना विकेट मिळत होत्या. मिलर आणि मार्कराममध्ये मॅचविनिंग पार्टनरशिप झाली. पण आम्ही मैदानात तेवढे चांगले खेळलो नाही. आम्ही अशा कंडीशन्समध्ये खेळलो आहोत. त्यामुळे कंडीशन्सच कारण देणार नाही. आम्हाला कामगिरीत सातत्य ठेवणं गरजेच आहे. आम्ही आम्हाला मिळालेल्या संधीचा लाभ उठवू शकलो नाही. आम्ही काही रनआऊट सोडले, मी सुद्धा त्यात होतो” असं प्रामाणिकपणे रोहितने मान्य केलं.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.