AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते नेहमी अजितदादांच्या सोबतच असायचे, पण विमान अपघाताच्या दिवशी का नव्हते? बड्या नेत्याच्या संशयानं मोठी खळबळ

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, या अपघातावर काही नेत्यांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. या अपघातावर बोलताना नेत्यानं उपस्थित केलेल्या शंकेमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

ते नेहमी अजितदादांच्या सोबतच असायचे, पण विमान अपघाताच्या दिवशी का नव्हते? बड्या नेत्याच्या संशयानं मोठी खळबळ
Ajit Pawar plane crash Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 6:18 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, मुंबईवरून प्रचारसभेसाठी बारामतीला येत असताना त्यांचा अपघात झाला होता. विमान धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनिला धडकलं, त्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघातावर काही नेत्यांकडून शंका उपस्थित केली जात आहे. अमोल मिटकरी, यांच्यासह छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. दरम्यान त्यानंतर आता बीडचे खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.

दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का? असं म्हणत त्यांनी शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या अपघातावर बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे, सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या शंकेमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले सोनवणे? 

देशाचं महाराष्ट्राचं नेतृत्व हरवलं आहे. तळागाळातील प्रत्येक प्रश्नाची उकल अजित पवारांना होती. दादा येतील आणि भेटील असं सर्वांना वाटते. हा प्रसंग दुःखाचा आहे. मी संशय व्यक्त केला आहे, मी आरोप केला नाही. सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे, पुरावे देण्यासारखा विषय नाही. मी संशय व्यक्त केला आहे. याची चौकशी व्हावी असं मला वाटतं. झालेल्या घटनेची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना मी भेटणार आहे. अजितदादा माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, या अपघाताची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. कोणी आरोप करत नाही, सर्वजण शंका व्यक्त करतात तसा घटनाक्रम आहे, असं यावेळी बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, मी समोरासमोर जाऊन बोलणारा माणूस आहे.  अजित पवारांसोबत पीए का नव्हते?  नेहमी सोबत असणारे पीए कुठे गेले होते?  त्यादिवशी फक्त गार्ड सोबत होते, असा प्रश्न उपस्थित करतानाच  मी फक्त संशय व्यक्त केलेला आहे. याबाबत मी संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहे,  मुख्यमंत्री यांनाही भेटणार आहे. सर्व प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीने केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मला त्यांच्यावर विश्वास आहे, असंही यावेळी बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं