AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : विराट नाहीतर हा खेळाडू जगातील नंबर वनचा फलंदाज, श्रीलंकेच्या माजी गोलंदाजाचं वक्तव्य!

आताच्या मॉर्डन क्रिकेटमध्ये अनेकवेळा विराट कोहली सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. मात्र अनेकवेळा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची कोहलीसोबत तुलना केली जाते.

Cricket : विराट नाहीतर हा खेळाडू जगातील नंबर वनचा फलंदाज, श्रीलंकेच्या माजी गोलंदाजाचं वक्तव्य!
| Updated on: Aug 04, 2023 | 11:22 PM
Share

मुंबई : आताच्या मॉर्डन क्रिकेटमध्ये अनेकवेळा विराट कोहली सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. मात्र अनेकवेळा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची कोहलीसोबत तुलना केली जाते. यावर कोहली एक मोठा खेळाडू असल्याचं बाबर आझमने म्हटलं आहे. मात्र श्रीलंकेचा माजी गोलंदाज चामिंडा वास याने जगातील एक नंबर फलंदाज कोण याबाबत बोलताना विराट कोहली याचं नाव न घेता बाबर आझमचं नाव घेतलं आहे.

चामिंडा वास नेमकं काय म्हणाला?

विक्रम हे मोडण्यासाठीच रचले जात असतात. वेगवेगळ्या खेळाडूंनी रेकॉर्ड मोडले आहेत. विराट कोहलीची खास गोष्ट म्हणजे दिवसेंदिवस तो तरूण होत चालला आहे. वय हे फक्त नंबर झाले असून कोहली आता ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे त्यावरून तरी तो भरपूर काही मिळवेल, असं चामिंडा वास म्हणाला. यावेळी बोलताना बाबर आझम ह नंबर वन फलंदाज असल्याचं वास यांनी सांगितलं.

सर्वांना माहित आहे की बाबर आझम हा नंबर वनचा फलंदाज आहे. संघासाठी तो ज्या प्रकारे योगदान देतो ते उल्लेखनीय आहे. युवा खेळाडूंसाठी त्याच्याकडू खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यासोबतच नसीम शाहसुद्धा उत्कृष्ट गोलंदाज आहे. लवकरच दोघांनाही लका प्रीमिअर लीगमध्ये पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं चामिंडा वास म्हणाला. बाबर आझमला कोलंबो स्ट्रायकर्स संघाने विकत घेतलं आहे. लंका प्रीमिअर लीगमध्ये कोलंबो संघाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे.

दरम्यान, विराट कोहलीने आताच आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरूद्ध खेळला होता. या सामन्यामध्ये त्याने आपलं 76 आंतरराष्ट्रीय शतक झळकवलं आहे. वेस्ट इंडिजविरूद्धचा हा सामना पावसामुळे ड्रॉ करण्यात आला होता.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.