क्रिकेटवर पुन्हा मॅच फिक्सिंगच सावट, ‘या’ टीमवर आरोप, ICC ला चौकशीच निमंत्रण

| Updated on: Nov 24, 2022 | 1:17 PM

कधी झाली फिक्सिंग? थेट संसदेत आरोप

क्रिकेटवर पुन्हा मॅच फिक्सिंगच सावट, या टीमवर आरोप, ICC ला चौकशीच निमंत्रण
cricket
Image Credit source: (PC-GETTY IMAGES)
Follow us on

कोलंबो: क्रिकेट पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगच्या सावटाखाली आहे. थेट पाकिस्तानी टीमच्या एका सीरीजवर मॅच फिक्सिंगचा आरोप झालाय. याआधी सुद्धा पाकिस्तानी टीम मॅच फिक्सिंगच्या आरोपांमध्ये अडकली आहे. पाकिस्तानी टीम काही महिन्यांपूर्वी एक टेस्ट सीरीज खेळली. त्यावर फिक्सिंगचा आरोप होतोय.

थेट संसदेत झाला आरोप

श्रीलंका-पाकिस्तान टेस्ट सीरीजमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप होतोय. ही कसोटी मालिका 1-1 अशी ड्रॉ झाली होती. श्रीलंकेच्या एका मोठ्या नेत्याने तिथल्या संसदेत आरोप केलाय. पाकिस्तान-श्रीलंका टेस्ट सीरीजमध्ये फिक्सिंग झाली होती, असं या नेत्याच म्हणणं आहे.

श्रीलंकन बोर्डाने तात्काळ उचललं हे पाऊल

या आरोपांनंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आयसीसीला टेस्ट सीरीजच्या चौकशीच निमंत्रण दिलं आहे. पाकिस्तानी टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. तिथे 1-1 ने कसोटी मालिका ड्रॉ झाली.

कोणी कुठली कसोटी जिंकली?

या टेस्ट सीरीजमध्ये पाकिस्तानच्या टीमने गॉलमध्ये पहिला कसोटी सामना 4 विकेटने जिंकला होता. दुसऱ्या टेस्टमध्ये श्रीलंकेच्य़ा टीमने पुनरागमन केलं. 246 धावांनी श्रीलंकेने ही टेस्ट सीरीज जिंकली.

पीसीबीने या आरोपांवर अजून काही उत्तर दिलेलं नाही. श्रीलंका किंवा आयसीसीकडून या विषयावर अजून कोणतीही सूचना मिळालेली नाही, असं पीसीबी अधिकाऱ्याने सांगितलं. त्यामुळे या विषयावर ते काही बोलू शकत नाहीत.