Team India : ना जडेजा ना कोहली, ‘हा’ आहे टीम इंडियाचा बेस्ट फिल्डर, आकडेवारीतही टॉपर!
येत्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. आशिया कप आता दोन दिवसांमध्ये सुरू होणार आहे. बॅटींग आणि बॉलिंगसोबतच फिल्डिंग हा एक्स फॅक्टर ठरणार आहे. एक कॅच संपूर्ण सामना पालटवू शकतो. त्यामुळे संघ बांधणी करताना टीम इंडियाला फिल्डिंगचाही विचार करावा लागणार आहे. 2019 नंतर कोणत्या खेळाडूने किती कॅच पकडले किती सोडले? जाणून घ्या.
1 / 5

2019 वर्ल्ड कप नंतर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने एकही कॅच सोडला नाही. त्याने एकूण आठ कॅच पकडले एकही कॅच त्याने सोडला नाही.
2 / 5

अक्षरनंतर दुसऱ्या स्थानी सूर्यकुमार यादव याने एकून 15 झेल घेतले आहेत. यामधील दोन कॅच पकडण्यात तो अयशस्वी ठरला. सूर्याची कॅच पकडण्याची टक्केवारी 88.2 इतकी आहे.
3 / 5

तिसऱ्या स्थानी किंग कोहली असून त्याने एकूण 20 कॅच पकडले आहेत. मात्र 5 कॅच पकडण्यात त्याला अपयश आलं.
4 / 5

टीम इंडियाचा स्टार फिल्डर रविंद्र जडेजा चौथ्या स्थानी आहे. त्याने 10 कॅच पकडले असून 2 कॅच पकडण्यात तो यशस्वी ठरला नाही.
5 / 5

के एल राहुल हा पाचव्या स्थानी असून त्याने चारपैकी एक कॅच सोडला आहे. तीन कॅच पकडले आहेत.
Follow Us