जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्याशी संबधीत एक महत्वाचा खुलासा केलेला आहे. अमित शाह यांनी कांबळीशी झालेल्या एका भेटीचा किस्सा सांगितला आहे. या भेटीत विनोद याला विचारलेल्या एका प्रश्नावर त्याने दिलेल्या उत्तराने ते चकीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?
| Updated on: Dec 09, 2024 | 4:14 PM

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद काबंळी याचा वाईट काळ सुरु झाला आहे. एकेकाळचा धडाकेबाज फलंदाज विकलांग अवस्थेत जगत आहे. सचिनचा जिवलग मित्र असलेल्या विनोदला एकेकाळी सचिन सारखेच पैसा, प्रसिद्धी आणि सुखसुविधा मिळाल्या होत्या. परंतू आता परिस्थिती उलट झाली आहे. त्याचे शरीर त्याला साथ देत नाहीए न त्याच्याकडे चांगले जीवन जगण्यासाठी पैसा उरला आहे. त्याला अनेक आजार झाले आहेत. आता तो केवळ बीसीसीआयच्या पेन्शनवर दिवस ढकलत आहे. या दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी विनोद याच्या भेटीचा एक किस्सा सांगितला आहे.

अमित शाह यांनी विनोद कांबळीबद्दल काय सांगितले ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विनोद कांबळी याचा एक किस्सा सांगितला आहे. अमित शाह यांनी सांगितले की चेन्नईत एका क्रिकेट कार्यक्रमात आपली भेट विनोद कांबळी याच्याशी झाली. तेव्हा विनोद कांबळी निवृत्त झालेले होते. परंतू एकेकाळी ते चांगले बॅट्समन म्हटले जायचे. तेव्हा आपली विनोद यांना विचारले की तुमच्या जीवनाच्या या चढउतार तुम्ही सर्वात आनंदी केव्हा होता ? तो काळ मला सागा ? मला वाटले की ते सांगतील की डबल सेच्युरी मारली तेव्हा. परंतू त्यांनी मला सांगितले की, ‘ सर मी अनेक खेळाडूंना हरवले आहे. आम्ही जिंकलो आणि अनेक रेकॉर्ड तोडले. परंतू आजही मला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो. जेव्हा मी कुठल्या युवा खेळाडूला बॅकफूटवर खेळायला शिकवतो.’

विनोद कांबळी याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. भारतासाठी १०० हून अधिक एक दिवसीय सामने खेळलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विनोद हा लहानपणीचा मित्र आहे. एकेकाळी दोघांची मैत्री खूपच प्रसिद्ध होती. एकीकडे सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते. दुसरीकडे विनोद कांबळी खूप काळापासून एकांत जीवन जगण्यास मजबूर आहेत. या दरम्यान, अमित शाह यांनी विनोद कांबळी सोबत झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

कांबळीने याने १०४ वनडे आणि १७ कसोटी सामने खेळला

विनोद कांबळी याने भारतासाठी १०४ वनडे आणि १७ कसोटी सामने खेळला आहे. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना साल १९९५ मध्ये खेळला होता. तर ५० षटकाचा शेवटचा वनडे सामना साल २००० मध्ये खेळला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us