odisha train accident मधील अपघातग्रस्तांसाठी Virat Kohli ने 30 कोटी रुपये दान केले? नेमकं सत्य काय?
Odisha Train Accident मधील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी उद्योगपती तसच माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग पुढे आला आहे. विराट कोहलीने टि्वट करुन या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं.
मुंबई : ओदिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला. हा मागच्या काही वर्षातील देशातील सर्वात मोठा भीषण रेल्वे अपघात आहे. 288 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 900 प्रवासी जखमी झालेत. त्यावरुन या अपघाताच्या भीषणतेची कल्पना येते. सध्या टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी इंग्लंडमध्ये गेली आहे. विषयाची गंभीरता लक्षात घेत, विराट कोहलीने टि्वट करुन या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं. आता विराट कोहलीने ट्रेन दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी रिलीफ फंडमध्ये दान केल्याची बातमी आहे.
नेमकं यामध्ये सत्य किती? हा खरा प्रश्न आहे. खरोखर विराट कोहलीने ओदिशा ट्रेन दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी काही कोटी रुपये दान केलेत? किती रक्कम दान केलीय? या बातमीत किती तथ्य आहे? ते जाणून घेऊया.
हे सत्य आहे की, असत्य?
विराट कोहलीने ओदिशा ट्रेन दुर्घटनेच्या रिलीफ फंडसाठी 30 कोटी रुपये दान केल्याची बातमी आहे. हे आम्ही म्हणत नाहीय. सोशल मीडियावर ही चर्चा आहे. सोशल मीडियावरच्या अशा चर्चांमध्ये, पोस्टमध्ये अजिबात तथ्य नसतं. त्यामुळे अनेकांना हे सत्य आहे की, असत्य? असा प्रश्न पडतो.
तपासातून काय समजलं?
सोशल मीडियावरच्या या फोटोमधून विराट कोहलीच मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न झालाय. विराट एक मोठा खेळाडू आहे, याज अजिबात शंका नाहीय. पण त्याने ओदिशा ट्रेन दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी रक्कम दान केल्याच्या बातमीत अजिबात तथ्य नाहीय. कारण याचा एकही ठोस पुरावा नाहीय. विराटने सुद्धा स्वत: काही टि्वट केलेलं नाहीय. कुठलही असं अधिकृत वक्तव्य नाहीय, ज्यातून विराटने अशी कुठली मदत केल्याच स्पष्ट होत नाहीय. एमएस धोनीने महिला कुस्तीपटूंना सपोर्ट् केल्याची सुद्धा सोशल मीडियावर चर्चा आहे. पण त्यात सुद्धा अजिबात तथ्य नसल्याच समोर आलं. धोनीची नुकतीच गुडघ्याची सर्जरी झाली. त्यातून त्याची सावरण्याची प्रक्रिया सुरु आहे.