AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक पोस्ट दोन कोटी लाईक…विराटचा सोशल मीडियावर अनोखा विक्रम, भारतात अशी कामगिरी करणारा पहिलाच

Virat Kohli post record viral on social media: भारतात इस्टांग्रामवर सर्वाधिक लाईक कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या घोषणेच्या पोस्टला यापूर्वी मिळाल्या होत्या. तो विक्रम विराटच्या पोस्टने मोडला आहे. विराट कोहलीने आता टी 20 प्रकारतून निवृत्ती घेतली आहे. एकदिवशीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो खेळताना क्रिकेटप्रेमींना दिसणारच आहे.

एक पोस्ट दोन कोटी लाईक...विराटचा सोशल मीडियावर अनोखा विक्रम, भारतात अशी कामगिरी करणारा पहिलाच
team india
| Updated on: Jul 03, 2024 | 1:56 PM
Share

भारताने टी 20 विश्वचषक जिंकला. तब्बल 17 वर्षांनी भारताने पुन्हा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यानंतर संपूर्ण देश आनंदात बुडाला. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात विराट कोहली यांची खेळी महत्वाची ठरली. त्यामुळे सामन्याचा सामनावीर पुरस्कार विराट कोहली याला मिळाला. क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या विराटने सोशल मीडियाच्या मैदानाही अनोखा विक्रम केला आहे. भारताच्या विजयानंतर विराट कोहली पोस्ट इन्टाग्रामवर शेअर केली. या पोस्टला दोन कोटींपेक्षा जास्त लाईक मिळाल्या आहेत. आशिया खंडात सर्वाधिक लाईक मिळवणार विराट कोहली दुसरा व्यक्ती ठरला आहे. भारतात एखाद्या पोस्टला सर्वाधिक लाईक मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

टीम इंडियाच्या जल्लोषाची भावनिक पोस्ट

विराट कोहली याने टीम इंडियाचा भावनिक पोस्ट टाकली होती. टीम इंडियाचा संघ विजेतेपदासह त्या पोस्टमध्ये दिसत आहे. त्यात विराटने म्हटले, “मी यापेक्षा चांगल्या दिवसाचे स्वप्नही पाहिले नसते. देव महान आहे आणि मी कृतज्ञतेने त्याच्यासमोर माझे डोके टेकवतो. शेवटी आम्ही करुन दाखवले. जय हिंद!” विराटने ही पोस्ट टाकून तीनच दिवस झाले. त्याला 20 दक्षलक्ष पेक्षा जास्त लाईक मिळाला. हजारो जणांनी प्रतिक्रिया दिल्या.

विराटची क्रिकेटप्रमाणे सोशल मीडियावर लोकप्रियता

विराट कोहली क्रिकेटप्रमाणे सोशल मीडियामध्ये लोकप्रिय आहे. 270 दशलक्ष त्याचे फॉलोअर्स आहे. त्याने कोणतीही पोस्ट टाकली तरी लाखोंमध्ये लाईक मिळतात. आता भारतीय संघाने विजतेपद मिळाल्यानंतर केलेल्या पोस्टने विक्रमच केला आहे. टी 20 विश्वचषकात भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या कोहलीच्या पोस्टने संघाच्या यशात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आहे. ही पोस्ट भारतीय क्रिकेट संघ आणि त्याच्या चाहत्यांचा सामूहिक आनंद देणारी ठरली आहे. कोहली एक जागतिक आयकॉन आणि लोकप्रियव्यक्ती बनला आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्राचा विक्रम मोडला

भारतात इस्टांग्रामवर सर्वाधिक लाईक कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या घोषणेच्या पोस्टला यापूर्वी मिळाल्या होत्या. तो विक्रम विराटच्या पोस्टने मोडला आहे. विराट कोहलीने आता टी 20 प्रकारतून निवृत्ती घेतली आहे. एकदिवशीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो खेळताना क्रिकेटप्रेमींना दिसणारच आहे.

हे ही वाचा…

विराटने पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉलवर दाखवली चक्रीवादळाची भीषणता, बारबाडोसमध्ये अडकली टीम इंडिया

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.