AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटने पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉलवर दाखवली चक्रीवादळाची भीषणता, बारबाडोसमध्ये अडकली टीम इंडिया

virat kohli and anushka sharma: भारतीय टीम बारबाडोसमध्ये अडकली आहे. भारतीय संघाला परत आणण्यासाठी चार्टड प्लेन बीसीसीआय पाठवणार आहे. आता भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री ११ वाजता टीम इंडियाचे विमान वेस्ट इंडिजमधून भारतात निघण्याची शक्यता आहे. गुरुवारी भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल होणार आहे.

विराटने पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉलवर दाखवली चक्रीवादळाची भीषणता, बारबाडोसमध्ये अडकली टीम इंडिया
virat kohali
| Updated on: Jul 03, 2024 | 8:32 AM
Share

भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे विजयी भारतीय संघाचे देशात स्वागत करण्यासाठी तमाम क्रिकेटप्रेमी वाट पाहत आहे. परंतु अंतिम सामना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजमध्ये धोकादायक चक्रीवादळ आले. यामुळे वेस्ट इंडिजला जाणारी आणि येणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली होती. विराट कोहली याने विश्वविजेतपद पटकवल्यानंतर मैदानातूनच कुटुंबाशी संवाद साधला होता. त्याची मुलगी आणि पत्नीशी तो बोलत असतानाचे दृश्य त्यावेळी सर्वांनी पाहिली. आता वेस्ट इंडिजमधील चक्रीवादळाची भीषणता विराटने अनुष्का शर्माला दाखवली आहे. व्हिडिओ कॉल करुन वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेले वेगाने वाहणारे वारे दाखवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय संघ अजूनही बारबाडोसमध्येच अडकला आहे.

काय आहे व्हिडिओत

विराट कोहली आणि भारतीय संघ अजूनही वेस्ट इंडिजमध्ये अडकला आहे. चक्रीवादळामुळे हॉटेलमधून बाहेर पडणेही शक्य नाही. त्यामुळे खेळाडू गप्पांमध्ये आणि कुटुंबाशी संवाद साधण्यात वेळ घालवत आहेत. विराट कोहलीने अनिष्काला व्हिडिओ कॉल लावला. त्या माध्यमातून चक्रीवादळाची भीषणता तिला दाखवली. हॉटेलच्या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊन किती वेगाने वारे वाहत आहे, ते विराटने दाखवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर युजरच्या अनेक प्रतिक्रिया पडत आहेत.

चार दिवसांपासून भारतीय संघ अडकला

भारतीय संघाने 29 जून रोजी बारबाडोसमध्ये टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. रविवारी सामन्याचा राखीव दिवस ठेवण्यात आला होता. यामुळे टीम इंडियाचा परतण्याचा प्लॅन 30 जून रोजी रात्री ठेवण्यात आला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजमध्ये बेरील हे चक्रीवादळ सुरु झाले. त्यामुळे भारतीय संघ आणि सहयोगी कर्मचारी वेस्ट इंडिजमध्येच अडकले आहेत.

टीम इंडिया कधी परतणार

भारतीय टीम बारबाडोसमध्ये अडकली आहे. भारतीय संघाला परत आणण्यासाठी चार्टड प्लेन बीसीसीआय पाठवणार आहे. आता भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री ११ वाजता टीम इंडियाचे विमान वेस्ट इंडिजमधून भारतात निघण्याची शक्यता आहे. गुरुवारी भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल होणार आहे.

Follow Us
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.