AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ

Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ

| Updated on: Jun 20, 2026 | 2:34 PM
Share

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संसदेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाच्या निकालानंतर बोलताना त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबतही भाष्य केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संसदेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाच्या निकालानंतर बोलताना त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबतही भाष्य केले.

अनिल देसाई म्हणाले की, न्यायालयाचा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी निराशाजनक ठरला असावा. तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींमधून त्यांना काही गोष्टींची जाणीव झाली असेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.

यावेळी त्यांनी ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा ठाकरे गटात परतण्याबाबतही संकेत दिले. “ओमराजे निंबाळकर यांना पक्षात परत यायचे असेल तर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील,” असे देसाई यांनी स्पष्ट केले.

मात्र, पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहून आणि पक्षाच्या भूमिकेपासून दूर राहून त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याचेही देसाई यांनी नमूद केले. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्वाकडेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, फुटीर खासदारांच्या भवितव्याबाबतही राजकीय चर्चांना वेग आला आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर बंडखोर खासदारांसमोर अनेक आव्हाने उभी राहू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. विशेषतः ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी समर्थकांशी चर्चा करून पुढील राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर बंडखोर खासदारांचे भवितव्य आणि सध्याच्या राजकीय समीकरणांचा पुढील मार्ग अवलंबून राहणार असल्याचे मानले जात आहे.

राज्यातील या घडामोडींमुळे ठाकरे गट आणि बंडखोर खासदारांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Published on: Jun 20, 2026 02:34 PM

Follow Us