AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli याची टीम इंडियाच्या विजयानंतर जाहीर माफी, नक्की काय झालं?

Virat Kohli Apologized | विराटने टीम इंडिया विजयात सर्वाधिक योगदान दिलं. विराटने सर्वाधिक नाबाद 103 धावा केल्या. त्यानंतरही विराटने सर्वांसमोर माफी का मागितली? जाणून घ्या.

Virat Kohli याची टीम इंडियाच्या विजयानंतर जाहीर माफी, नक्की काय झालं?
वन डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करण्याता रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वन डे क्रिकेटमध्ये 48 शतके केली आहे. हा विक्रम मोडण्यापासून सचिन अवघी दोन शतके दूर आहे. विराट हा विक्रम कधी मोडणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
| Updated on: Oct 19, 2023 | 11:34 PM
Share

पुणे | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 17 वा सामना जिंकला आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सलग चौथा विजय ठरला. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 257 धावांचं आव्हान हे 41.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने 48 धावा केल्या. शुबमन गिल याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. श्रेयस अय्यर याने 19 धावांचं योगदान दिलं. तर केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंच पोहचवलं.

केएल राहुल याने 34 बॉलमध्ये नाबाद 34 धावा केल्या. तर विराट कोहली याने विजयी षटकारासह शतकही पूर्ण केलं. विराटने 97 बॉलमध्ये 103 धावांची खेळी केली. विराटचं हे 48 वं वनडे शतक ठरलं. विराटला या शतकी खेळीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. विराटने या खेळीनंतर जाहीर माफी मागितली. नक्की काय झालं आणि काय नाय हे जाणून घेऊयात.

विराटने कुणाची माफी मागितली?

विराटने रवींद्र जडेजा याची माफी मागितली. विराटने शतक ठोकल्याने त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. यामुळे जडेजाची संधी हुतली. जडेजाने 10 ओव्हरमध्ये 38 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे जडेजा मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार होता. विराट कोहली सामन्यानंतर प्रोस्ट प्रोडक्शन शो दरम्यान काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.

विराट काय म्हणाला?

“जडेजाकडून मॅन ऑफ द मॅच हिसकावस्यासाठी क्षमस्व. टीमसाठी मोठं योगदान देण्याची इच्छा होती. वर्ल्ड कपमध्ये माझा नावावर अर्धशतकं आहेत. मात्र मी त्याचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयशी ठरलो. मी अखेरपर्यंत मैदानात उभा राहून टीमला जिंकवू इच्छित होतो, जे मी गेल्या अनेक वर्षांसून करत आलोय”, असं विराट म्हणाला.

विराटकडून जडेजाची माफी

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास, तंझिद हसन, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.