Women’s Asia Cup : जेमिमा रॉड्रिग्सची दमदार खेळी, महिला आशिया चषकातून भारताची विजयी सुरुवात

| Updated on: Oct 01, 2022 | 8:33 PM

महिला आशिया चषक स्पर्धेत जेमिमाची चांगलीच चर्चा आहे. कारण जाणून घ्या...

Womens Asia Cup : जेमिमा रॉड्रिग्सची दमदार खेळी, महिला आशिया चषकातून भारताची विजयी सुरुवात
जेमिमा रॉड्रिग्सनची दमदार खेळी
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : जेमिमा रॉड्रिग्सनं (Jemimah Rodrigues) टी-20 (T20) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम 76 धावा केल्यानं महिला आशिया चषक (Women’s Asia Cup) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 41 धावांनी विजय मिळवलाय. जेमिमानं 53 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार मारून भारताला 6 बाद 150 धावांपर्यंत मजल मारली. विकेटवर कमी उसळीमुळे फलंदाजांना धावा काढणं तसं कठीण जात होतं. यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट घेत श्रीलंकेला 18.2 षटकांत 109 धावांत गुंडाळलं. यानंतर जेमिमा चांगलीच चर्चेत आली.

आयसीसीचं ट्विट

38 चेंडूत अर्धशतक

मनगटाच्या दुखापतीतून परतलेल्या जेमिमा रॉड्रिग्जनं सुरुवातीपासूनच नियंत्रण मिळवलं आणि तिनं उत्कृष्ट टायमिंगसह दमदार धावा केल्या. ती प्रत्येक षटकात सीमारेषेच्या पलीकडे चेंडू मिळवत राहिली.

जेमिमानं 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (30 चेंडूत 33 धावा) सोबत भारताला 100 धावांच्या पुढे नेलं. दोघींनी 71 चेंडूत 92 धावा केल्या.

भारताची सलामीची जोडी

भारताची सुरुवात खराब झाली आणि स्मृती मानधना (10 धावा) बाद होणारी पहिली खेळाडू ठरली आहेय. तर सहकारी सलामीवीर शेफाली वर्मा (6) हिला अडचणी येत राहिल्या आणि फिरकीपटू ओशादी रणसिंघेचा (32 धावांत 3 बळी) पहिला बळी ठरला.

सुगंधा कुमारीनं तिचा झेल सोडल्यानं हरमनप्रीतही धोकादायक दिसत होती. तिला 15 षटकांत जीवदान मिळालं. मात्र, या भारतीयाला त्याचा फायदा घेता आला नाही आणि पुढच्याच षटकात रणसिंगनं तिला यष्टिचित केलं.

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकात पुनरागमन करत विकेट्स घेतल्या. जेमिमा झपाट्यानं धावा करत होती आणि तिनं तिच्या मागील कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 72 टी-20 आंतरराष्ट्रीय धावसंख्येला मागे टाकले. चामारी अटापट्टूच्या कमी चेंडूवर त्याची धडाकेबाज खेळी संपुष्टात आली. भारतानं 6 बाद 150 धावा केल्या.