AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World cup 2023 : तर टीम इंडियाला विजय घोषित करण्यात येईल

World cup 2023 : टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली आहे. टीम इंडियाचा सामना आता दुसऱ्या सेमीफायनलमधील विजयी संघासोबत होणार आहे. पण त्याआधी आयसीसीने महत्त्वाची घोषणा केली आहे.

World cup 2023 : तर टीम इंडियाला विजय घोषित करण्यात येईल
world cup 2023
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 16, 2023 | 1:17 PM
Share

World cup 2023 Final : विश्वचषक 2023 आता अंतिम टप्प्यात आहे. भारताने सेमीफायनल जिंकत फायनलमध्ये धडक दिली आहे. तर आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी सेमीफायनल रंगणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डनवर हा सामना होणार आहे. जो संघ आज जिंकेल तर फायनलमध्ये भारतासोबत भिडणार आहे. पण जर वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सामना रद्द झाला तर काय होईल

वर्ल्डकप २०२३ ची फायलन 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. पण सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि सामना रद्द होण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर चाहत्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण आयसीसीने अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद असल्याचे जाहीर केले होते. अशा परिस्थितीत 19 नोव्हेंबरला पाऊस पडला तर 20 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

या स्थितीत भारत ठरेल विश्वचषक विजेता

जर 20 नोव्हेंबरला म्हणजेच राखीव दिवशी पावसाने व्यत्यय आणला आणि सामना मध्येच थांबवावा लागला, तर भारताला 2023 चा विश्वचषक विजेता घोषित केले जाईल. याचे कारण भारताने साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना पराभूत केले होते. टीम इंडिया लीग स्टेजमध्ये टेबल टॉपर होती. त्यामुळे राखीव दिवशीही पाऊस पडला तर भारतीय संघ चॅम्पियन होईल.

सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

भारताने पराभवाचा वचपा काढला आहे. टीम इंडियानं सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. भारतानं न्यूझीलंडला 398 धावांचे टार्गेट दिले होते. पण न्यूझीलंडची संपूर्ण इनिंग 48.5 ओव्हर्समध्ये 327 धावांवर संपुष्टात आली.

मोहम्मद शमीच्या 7 विकेट्स

एकाच सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा शमीने तिसऱ्यांदा पराक्रम केला आहे. त्याने सेमीफायलनमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध दोन वेळा त्याने ही कामगिरी केली आहे. तर वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 50 विकेट्स घेणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत