AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World cup 2023 : तर टीम इंडियाला विजय घोषित करण्यात येईल

World cup 2023 : टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली आहे. टीम इंडियाचा सामना आता दुसऱ्या सेमीफायनलमधील विजयी संघासोबत होणार आहे. पण त्याआधी आयसीसीने महत्त्वाची घोषणा केली आहे.

World cup 2023 : तर टीम इंडियाला विजय घोषित करण्यात येईल
world cup 2023
| Updated on: Nov 16, 2023 | 1:17 PM
Share

World cup 2023 Final : विश्वचषक 2023 आता अंतिम टप्प्यात आहे. भारताने सेमीफायनल जिंकत फायनलमध्ये धडक दिली आहे. तर आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी सेमीफायनल रंगणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डनवर हा सामना होणार आहे. जो संघ आज जिंकेल तर फायनलमध्ये भारतासोबत भिडणार आहे. पण जर वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सामना रद्द झाला तर काय होईल

वर्ल्डकप २०२३ ची फायलन 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. पण सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि सामना रद्द होण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर चाहत्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण आयसीसीने अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद असल्याचे जाहीर केले होते. अशा परिस्थितीत 19 नोव्हेंबरला पाऊस पडला तर 20 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

या स्थितीत भारत ठरेल विश्वचषक विजेता

जर 20 नोव्हेंबरला म्हणजेच राखीव दिवशी पावसाने व्यत्यय आणला आणि सामना मध्येच थांबवावा लागला, तर भारताला 2023 चा विश्वचषक विजेता घोषित केले जाईल. याचे कारण भारताने साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना पराभूत केले होते. टीम इंडिया लीग स्टेजमध्ये टेबल टॉपर होती. त्यामुळे राखीव दिवशीही पाऊस पडला तर भारतीय संघ चॅम्पियन होईल.

सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

भारताने पराभवाचा वचपा काढला आहे. टीम इंडियानं सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. भारतानं न्यूझीलंडला 398 धावांचे टार्गेट दिले होते. पण न्यूझीलंडची संपूर्ण इनिंग 48.5 ओव्हर्समध्ये 327 धावांवर संपुष्टात आली.

मोहम्मद शमीच्या 7 विकेट्स

एकाच सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा शमीने तिसऱ्यांदा पराक्रम केला आहे. त्याने सेमीफायलनमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध दोन वेळा त्याने ही कामगिरी केली आहे. तर वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 50 विकेट्स घेणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.