
“टी20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमने भारताचा तिरंगा झेंडा फडकवलेला आहे. काल अनेक रेकॉर्ड तोडत न्यूझीलंडचा पराभव भारताने केला. टी20 सामन्याच्या इतिहासामध्ये फायनलमध्ये अशा प्रकारचा स्कोर करणं, अशा पद्धतीने गारद करणं हा नवीन रेकॉर्ड आहे. विशेषत: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केली, त्यामुळे भक्कम फाऊंडेशन झालं. बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह यांनी ज्या प्रकारे पूर्ण सीरीजमध्ये अतिशय इकोनॉमिक बॉलिंग केली. कालही ज्या प्रकार न्यूझीलंड टीमला गारद केलं ती विलक्षण पद्धतीची बॉलिंग पहायला मिळाली. एूकण टीमचा परफॉर्मन्स उत्तम राहिला” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं कौतुक केलं.
“एक सामना आपण हरलो बाकी कुठल्या सामन्यात पराजित झालो नाही. एक मोठा विजय मिळवला. सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीम या सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आणि मुंबईचे खेळाडू देखील टीममधील त्यांनी उत्तम खेळ केला. शिवम असेल सूर्या असतील मनासापूसन अभिनंदन करतो. मी आज त्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भारत ठामपणे उभा राहिला
“मोदी सरकारने भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित केली आहे. मोदींनी दाखवून दिलं, ज्यावेळी टॅरिफ वॉर झालं, त्यावेळी भारत झुकला नाही. भारत ठामपणे उभा राहिला. वेगवेगळ्या देशांसोबत टॅरिफ करार केले. टॅरिफ वॉर करणाऱ्यांना मागे हटावं लागलं. एका कुटुंबाची गुलामगिरी करणाऱ्यांनी यावर बोलणं हास्यास्पद आहे” असं फडणवीस म्हणाले.
कोणीही अफवा पसरवू नये
“केंद्र सरकार तेल, गॅस या गोष्टींची काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. कुठेही तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी उपायोजना चालू आहेत. कोणीही अफवा पसरवू नये. अफवांवर विश्वास ठेऊन साठे केले तर परिस्थिती खराब होईल. डिमांड आणि सप्लायचं सूत्र बिघडेल. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की, अफवांवर विश्वास ठेऊ नका. केंद्र सरकार या संदर्भात उचित काळजी घेत आहे. देशात युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय, ती व्यवस्थित हाताळण्यांच काम मोदींजीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार करत आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.