MI vs KKR : टॉसच्यावेळी केकेआरचा गेम का? हार्दिकने नाणं हवेत उडवलं पण..अजिंक्य रहाणे सुद्धा हैराण, मुंबईच्या सामन्यात वाद

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये काल सामना झाला. आता या मॅचमध्ये टॉसच्यावेळी घडलेल्या एक घटनेवरुन वाद निर्माण झाला आहे. क्रिकेट चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

MI vs KKR : टॉसच्यावेळी केकेआरचा गेम का? हार्दिकने नाणं हवेत उडवलं पण..अजिंक्य रहाणे सुद्धा हैराण, मुंबईच्या सामन्यात वाद
MI vs KKR
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 30, 2026 | 9:32 AM

MI vs KKR : IPL 2026 च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सला हरवलं. IPL मधील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने हा विजय मिळवला. या मॅच दरम्यान अशी एक घटना घडली, त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या वादाचा संबंध मॅचमधील टॉसशी आहे. त्यावर क्रिकेट फॅन्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका क्रिकेट चाहत्याने विचारलं की, हे असं मुंबई इंडियन्सच्या सामन्यातच कसं होतं?. मॅचच्या आधी रहाणेने जे पाहिलं, त्यामुळे तो सुद्धा हैराण दिसला.

पण प्रश्न हा आहे की, झालं काय? ज्यावरुन मुंबई विरुद्ध केकेआर सामन्यात इतका वाद झाला?. हा सगळा विषय टॉसशी संबंधित आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने हवेत टॉस उडवला. रहाणे छापा-काटा काय ते बोलला. पण नाणं जमिनीवर पडल्यानंतर कॅमेऱ्यावर हेड की टेल आलं हे नाही दाखवलं. सरळ मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला हे जाहीर केलं. क्रिकेट फॅन्सना ही गोष्ट पचनी पडत नाहीय. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

MI vs KKR मॅचच्या टॉसच्यावेळी जे घडलं, त्याला कोणी टॉस फिक्सिंग ठरवलं. एकाने विचारलं हे असं मुंबई इंडियन्सच्या सामन्यातच का होतं? एकाने जाणूनबुजून शिक्का हरवला असाही आरोप केला.

अजिंक्य रहाणेला कसलं आश्चर्य वाटलं?

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. KKR चा कॅप्टन अजिंक्य रहाणे सुद्धा बोलला की, त्यांना पहिली गोलंदाजी करायची होती. वानखेडेच्या पीचवर अजिंक्य रहाणेने आश्चर्य व्यक्त केलं. “याआधी मी कधी वानखेडेच्या पीचवर इतकं गवत बघितलेलं नाही. ज्या प्रॅक्टिस पीचवर मी खेळलोय ते यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते”

कोलकाता टीमने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 220 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने 20 व्या ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य पार केलं. मुंबईने 6 विकेट आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला. मागचे 13 सीजन मुंबई इंडियन्सचा सतत पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे.

Follow Us