AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात आदित्य ठाकरे का गेले? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले उद्या शिंदेंनी बोलवलं तर…

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांनी लावलेल्या हजेरीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात आदित्य ठाकरे का गेले?  संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले उद्या शिंदेंनी बोलवलं तर...
Sanjay raut Mohit Kamboj Aditya Thackeray
| Updated on: Mar 30, 2026 | 10:25 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच एका कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे फायरब्रँड नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय शत्रू असला तरी त्याच्याकडे जर एखाद्या मंगल कार्याचे आमंत्रण असेल तर ती आपली संस्कृती आहे की तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून आपण सहभागी व्हावं आणि निघून जावे, असे संजय राऊत म्हणाले.

भाजप नेते मोहित कंबोज आणि ठाकरे परिवार यांच्यात जुना वाद आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोहित कंबोज यांनी ठाकरेंवर सातत्याने गंभीर आरोप केले होते. अगदी शिवसेना फोडण्यामागेही मोहित कंबोज यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत, मोहित कंबोज यांच्या घरच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावर या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर ठाकरे-भाजप जवळीकता वाढली का? अशी चर्चा सुरू झाली.

आता या सर्व घडामोडींवर संजय राऊतांनी भाष्य केले. कोणी एखाद्या शुभकार्याला बोलवले तर तिथे जाणे चुकीचे नाही. तो कौटुंबिक कार्यक्रम होता आणि तिथे अनेक क्षेत्रांतील लोक उपस्थित होते. आदित्य ठाकरे तिथे थोड्या वेळासाठी गेले होते, असे मी वाचले आहे. अशा मंगल कार्याला कुणी निमंत्रित केले असेल, तर त्यावर राजकारण करणे योग्य नाही, असे संजय राऊत म्हणाले.

राजकीय शत्रू असला तरी त्याच्याकडे एखाद्या मंगल कार्याचे आमंत्रण असेल, तर तेवढ्यापुरती कटुता दूर ठेवून सहभागी होणे ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. तो राजकीय सोहळा नव्हता, त्यामुळे त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नये, असेही संजय राऊतांनी सांगितले. तसेच राजकीय संघर्ष कधीही संपत नाही, तो कायम सुरूच राहतो. मात्र, वैयक्तिक संबंध आणि सार्वजनिक जीवनातील शिष्टाचार पाळणे हे वेगळे असते. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्याचा अर्थ राजकीय जवळीक असा लावणे चुकीचे आहे, असेही संजय राऊतांनी नमूद केले.

शिंदेंनी आधी बोलावू तर द्या

यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांना जर एकनाथ शिंदे यांनी बोलावले तर तुम्ही जाल का? असा सवाल विचारला. त्यावर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. “त्यांनी आधी बोलावू तर द्या. त्यांच्याकडे सध्या कोणतेही शुभ कार्य आहे असे मला वाटत नाही, त्यांची सर्व कार्ये पार पडली आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.