Vaibhav Sooryavanshi: वैभवने केली सगळ्यांची बोलती बंद; इंग्लंडविरुद्ध असा कॅच पकडला की सगळ्या भुवया उंचावल्या, Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा टी-20 सामना काल पार पडला. कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने एक अफलातून कॅच पकडली ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभवने केली सगळ्यांची बोलती बंद; इंग्लंडविरुद्ध असा कॅच पकडला की सगळ्या भुवया उंचावल्या, Video Viral
vaibhav sooryavanshi
| Updated on: Jul 05, 2026 | 2:35 PM

आयपीएल 2026 मध्ये, राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला त्यांच्या काही सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरले आणि त्याला क्षेत्ररक्षणासाठी संधी दिली नाही. वैभव क्षेत्ररक्षणात कमकुवत असल्याच्या अफवा होत्या आणि अनेक अनुभवी खेळाडूंनी त्याला काय करावे याबद्दल सल्लाही दिला होता. आता, या तरुण खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण करून क्षेत्ररक्षण ही त्याची कमजोरी नाही हे सिद्ध केले आहे.  वैभवने शनिवारी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात मोठी खेळी केली नाही, परंतु स्फोटक गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार मारून त्याने दाखवून दिले की त्याच्याकडे किती प्रतिभा आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 190 धावा केल्या. आता भारतीय संघाची क्षेत्ररक्षणाची पाळी होती. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात फिल सॉल्ट आणि जोस बटलर यांना बाद करून सुरुवातीचे यश मिळवून दिले. जेकब बेथेल, टॉम बेंटन आणि हॅरी ब्रुक यांनी मधल्या फळीत शानदार खेळी करून संघाला सामन्यात परत आणले. सॅम करनही आपल्या फलंदाजीने भारताला अडचणीत आणणार होता, पण वैभवने घेतलेल्या एका अप्रतिम झेलमुळे तो पॅव्हेलियनमध्ये परतला. 18 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षित राणाने चौथा चेंडू करनच्या पायाशी टाकला. डावखुऱ्या फलंदाजाने तो फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. तिथेच उभा असलेला वैभव चेंडूचा अचूक अंदाज घेऊन योग्य वेळी उडी मारत सीमारेषेच्या अगदी आधी चेंडू पकडला. करन सात धावांवर बाद झाला. वैभवचा झेल पाहून, क्षेत्ररक्षण ही त्याची कमजोरी आहे असे कोणीही म्हणू शकले नाही.

भारत हा सामना सहा गडी राखून हरला. बेथेलने नाबाद 76 धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत 46 चेंडूंचा सामना केला आणि पाच चौकार व पाच षटकार मारले. हॅरी ब्रुक आणि टॉम बेंटन यांनी प्रत्येकी 39 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला एकही टी-20 सामना जिंकता आला नाही.

Follow Us