Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही इंग्लंडविरद्ध वैभवला संधी नाहीच? टीम इंडियाच्या कोचच्या विधानाने खळबळ

भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघावर अनेक टीका झाल्या. भारतीय संघाने पहिला सामना गमावूनही वैभव सूर्यवंशीला दुसऱ्या सामन्यात का खेळवले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता त्यावर भारतीय संघाच्या कोचने एक विधान केले आहे.

Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही इंग्लंडविरद्ध वैभवला संधी नाहीच? टीम इंडियाच्या कोचच्या विधानाने खळबळ
vaibhav sooryavanshi
| Updated on: Jun 29, 2026 | 1:50 PM

भारत आयर्लंड यांच्यात टी-20 मालिका पार पडली ज्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघावर अनेक टीका झाल्या. बेलफास्टमध्ये खेळलेले दोन्ही टी-20 सामने जिंकून आयर्लंडने टीम इंडियाला क्लीन स्वीप दिला. आयर्लंडविरुद्ध सामना किंवा मालिका गमावण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे, वैभव सूर्यवंशीला मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. भारत-आयर्लंड मालिकेसाठी त्याच्या नावाचा जोरदार प्रचार करण्यात आला होता, पण सूर्यवंशी बेंचवरच बसून राहिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आयर्लंडविरुद्ध पराभव होऊनही, टीम इंडियाने वैभवला सध्या तरी संधी दिली नाही. आता यानंतर भारतीय संघाचे असिस्टंट कोच रायन टेन डोशेट काय म्हणाले?

आयर्लंडविरुद्धच्या सनसनाटी पराभवानंतर रायन टेन डोशेट यांनी सांगितले की, वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे, पण त्याला संधीची वाट पाहावी लागेल. वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, पण तुम्ही संजू सॅमसनला वगळू शकत नाही. विश्वचषक जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आम्हाला खेळाडूंना अधिक संधी द्यायची आहे. वैभव सूर्यवंशीला आपल्या संधीसाठी वाट पाहावी लागेल.”

भारताला आता इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. पहिला सामना 1 जुलै रोजी होणार असून, या सामन्यातही वैभवला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांची जोडी आयर्लंडमध्ये अपयशी ठरली असली तरी, त्यांच्या कामगिरीचा हवाला देत टीम इंडिया त्यांना अधिक संधी देण्यास कटिबद्ध आहे. सलामीची जोडी म्हणून या दोन्ही खेळाडूंची कामगिरी खराब झाली आहे.

टीम इंडियाकडे अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यामुळे वैभव सूर्यवंशीला वाट पाहावी लागेल. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तो एक सलामीवीर आहे आणि अभिषेक शर्मा व संजू सॅमसनसारख्या खेळाडूंशी स्पर्धा करत आहे. अभिषेक शर्मा हा जगातील नंबर 1 टी-20 फलंदाज आहे आणि सॅमसनने टी-20 विश्वचषक जिंकला आहे. सूर्यवंशी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध पाच टी20 सामने आहेत. त्याला यापैकी एका सामन्यात नक्कीच संधी मिळेल. आता तो कोणता सामना असेल हे पाहणे बाकी आहे.

Follow Us