
ODI World Cup 2027 India Squad : टीम इंडियाने नुकताच टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकला. आता भारताची नजर पुढच्यावर्षी होणाऱ्या 2027 वनडे वर्ल्ड कपवर आहे. वनडे वर्ल्ड कप संदर्भात एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आलीय. रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाच्या सिलेक्टर्सनी ते 20 खेळाडू आधीच निवडलेत जे वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत. अजून वनडे वर्ल्ड कप वर्षभरावर असताना निवडकर्त्यांनी 20 खेळाडूंचं सिलेक्शन केलं आहे. आता आयपीएल दरम्यानही निवडकर्त्यांची त्या खेळाडूंवर नजर असेल.
आयपीएल दरम्यान भारतीय खेळाडू आपपाल्या टीमला विजयी करण्यासाठी ताकद लावतील. त्याचवेळी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती एसएएस दास, आरपी सिंह, अजय रात्रा आणि प्रज्ञान ओझा यांचं त्या खेळाडूंवर लक्ष असेल. निवडकर्ते खेळाडूंच्या सामन्याच्यावेळी त्या स्टेडियममध्ये असतील. या सदस्यांना स्टेडियम आणि टीव्हीवरील सामने पाहण्याची जबाबदारी दिली आहे. आयपीएलची सुरुवात 28 मार्चपासून होतेय. टी20 वर्ल्ड कपचं आयोजन ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2027 मध्ये होईल. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहेत.
बीसीसीआयची काय इच्छा?
टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर मुंबईत राहतात. शिवसुंदर दास कोलकता येथे राहतात. आरपी सिंह आणि अजय रात्रा दिल्ली-एनसीआरमध्ये वास्तव्याला आहेत. ओझा आयपीएलचे काही सामने बंगळुरु आणि हैदराबाद येथे पाहू शकतात. रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयची इच्छा आहे की, प्रत्येक निवडकर्त्याने आठवड्यातून कमीत कमी एक मॅच पहावी. जेणेकरुन दर आठवड्याला मैदानावर पाच सामने कव्हर होतील. 2027 वनडे वर्ल्ड कप आणि ऑलिंपिक खेळ लक्षात घेता आधीच 20 खेळाडू निवडले आहेत. याचा अर्थ यंदाच्या आयपीएलमधून कुठल्या नव्या स्टारला वर्ल्ड कपसाठी निवडणार नाही.