AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी-20 : तिसऱ्या सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर मात

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सहा विकेटने सामना जिंकला आहे. भारताने तिसरा सामना जिंकत टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. याआधी दुसरा टी-20 सामना पावसाने रद्द झाला होता. पहिल्या टी-20 सामन्याप्रमाणेच तिसरा टी-20 सामना अटीतटीत झाला. शेवटच्या षटकात कर्णधार विराट कोहलीने दोन चौकार मारत, भारताचा विजय निश्चीत केला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून […]

टी-20 : तिसऱ्या सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर मात
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM
Share

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सहा विकेटने सामना जिंकला आहे. भारताने तिसरा सामना जिंकत टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. याआधी दुसरा टी-20 सामना पावसाने रद्द झाला होता. पहिल्या टी-20 सामन्याप्रमाणेच तिसरा टी-20 सामना अटीतटीत झाला. शेवटच्या षटकात कर्णधार विराट कोहलीने दोन चौकार मारत, भारताचा विजय निश्चीत केला.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 165 धावांचे लक्ष्य दिलं होतं. त्याबदल्यात भारताने 19.4 षटकात 4  विकेटच्या मोबदल्यात 165 धावांचे लक्ष्य पूर्ण केलं. यावेळी मैदानावर विराट कोहलीने 41 चेंडूंचा सामना करत 61 धावा ठोकल्या. यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

दरम्यान, पहिल्या टी-20 सामान्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 17 षटकात 174 धावांचं आव्हान दिलं होतं. सलामीवीर शिखर धवनने धमाकेदार सुरुवात केल्यानंतरही भारताला सामना जिंकता आला नाही. तर दुसरा टी-20 सामना पावसाने रद्द झाला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारताने मालिका बरोबरीत सोडवली आहे.

टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रलियाने प्रथम फलंदाजी करताना डार्सी शॉर्टने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने 28 धावा केल्या. तसेच भारताकडून गोलंदाजी करताना कृणाल पंड्याने 4 तर कुलदिप यादवने 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

टी-20 मालिका

पहिला सामना – 21 नोव्हेंबर

दुसरा सामना – 23 नोव्हेंबर

तिसरा सामना – 25 नोव्हेंबर

कसोटी मालिका

पहिला सामना – 6 डिसेंबर

दुसरा सामना – 14 डिसेंबर

तिसरा सामना – 26 डिसेंबर

चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा