IND vs ZIM: बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी आता थेट संघच बदलला

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघात आता मोठा बदल केला जाईल. झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी हा बदल केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

IND vs ZIM:  बीसीसीआयने अचानक घेतला मोठा निर्णय, झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेसाठी आता थेट संघच बदलला
ravi bishnoi
| Updated on: Jul 12, 2026 | 1:20 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय मालिका नुकतीच संपली. ज्यात भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय वाईट पाहायला मिळाले. संघाने मालिका गमावली. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टी-20 मधील खराब कामगिरीनंतर भारतीय संघाला वनडेमधील कामगिरी चांगली करावीच लागेल नाहीतर संघावर आणखी टीका होतील. आता भारतीय संघाने आधीच चांगली कामगिरी केलेली नाही यातच आता बीसीसीआय ऐनवेळी संघात मोठा बदल करण्याची शक्यता आहे. बीसीसीआय लवकरच बदलेल्या संघाची अधिकृत घोषणा करेल.

आता टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली होती, ज्यात वरुणचा समावेश होता, पण आता असे वृत्त आहे की तो या मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. बीसीसीआयने त्याच्या जागी राजस्थान रॉयल्सच्या स्टार फिरकीपटू रवी बिश्नोईला संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती आयर्लंडविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले, पण त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. यामुळे तो पाचपैकी केवळ तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येच सहभागी होऊ शकला. आता, काही वृत्तांनुसार, वरुण चक्रवर्ती झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे.

स्पोर्ट्सस्टारच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने वरुण चक्रवर्तीच्या जागी रवी बिश्नोईची निवड केली आहे. बिश्नोई इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्याचा भाग होता, परंतु त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत त्याचा समावेश नव्हता. मात्र, आता वरुण बाहेर गेल्याने, रवी बिश्नोई झिम्बाब्वेविरुद्धच्या भारतीय संघात असू शकतो. बीसीसीआयकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेला 23 जुलैपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यामुळे आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकणे गरजेचे असणार आहे.

Follow Us