IPl 2021 : विराट कोहलीचा RCB संघ यंदा प्लेऑफ गाठणार नाही; ‘या’ माजी खेळाडूची भविष्यवाणी

| Updated on: Apr 04, 2021 | 5:45 PM

यंदा विराट कोहलीचा संघ किमान कागदावर तरी सर्वात बलवान वाटतोय. कारण या संघात एकाहून एक सरस खेळाडूंचा भरणा आहे.

IPl 2021 : विराट कोहलीचा RCB संघ यंदा प्लेऑफ गाठणार नाही; या माजी खेळाडूची भविष्यवाणी
विराट कोहली
Follow us on

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत गेल्या काही वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचं नेतृत्व करतोय. विराट हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. कारण आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा त्याच्याच नावावर आहेत. एकाच मोसमात सर्वात जास्त धावा फटकावण्याचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. आरसीबी संघाने आतापर्यंत 3 वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. परंतु त्यात त्यांना एकदाही आयपीएलचे जेतेपदही मिळवता आले नाही. यावर्षी विराट पुन्हा एकदा आपल्या संघाला आयपीएलचं विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. (IPL 2021: Aakash Chopra says RCB will not qualify for the playoffs)

यंदा विराट कोहलीचा संघ किमान कागदावर तरी सर्वात बलवान वाटतोय. कारण या संघात एकाहून एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. त्यातच संघमालकांनी यंदाच्या लिलावात अनेक मातब्बर खेळाडू स्वतःच्या संघात घेतले आहेत. अशा परिस्थितीत हा संघ यंदा आयपीएलच्या विजेतेपदाचा दावेदार आहे. विराटचा संघ आयपीएलच्या मागील मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचली होता, परंतु या संघाला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. एका बाजूला अनेकांना असं वाटतंय की, विराटचा संघ यंदा आयपीएल स्पर्धा जिंकू शकतो, तर काहींच्या मते हा संघ प्ले ऑफपर्यंत स्पर्धेत टिकेल. तर दुसऱ्या बाजूला माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समीक्षक आकाश चोप्रा याच्या मते रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ यंदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही.

आरसीबीने आयपीएल स्पर्धेतील अखेरचा अंतिम सामना 2016 मध्ये खेळला होता. तेव्हा कोहली संघाचा कर्णधार होता. अंतिम सामन्यात त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आरसीबीने एकूण तीन वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे, परंतु प्रत्येक वेळी हा संघ फायनलमध्ये अपयशी ठरला आहे.

RCB संघ यंदा प्लेऑफ गाठणार नाही

भारताचा माजी फलंदाज आणि कॉमेंटेटर आकाशने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटलं आहे की, या हंगामात आरसीबी त्यांच्या मागील हंगामातील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकणार नाही. तो म्हणाला, “मला वाटते की यावेळी हा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय होऊ शकणार नाहीत. मागील तीन-चार वर्षांचा इतिहास पाहता आरसीबीसाठी शेवटचा हंगाम सर्वोत्कृष्ट होता, परंतु अंतिम सामन्यांमध्ये त्यांनी लय गमावली.

कर्णधार विराट अयपशी

राट हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. कारण आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा त्याच्याच नावावर आहेत. एकाच मोसमात सर्वात जास्त धावा फटकावण्याचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे. IPL 2016 मध्ये विराटने 16 सामन्यांमध्ये 81.08 च्या सरासरीने तब्बल 973 धावा फटकावल्या होत्या. यामध्ये 4 शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाज म्हणून विराट यशस्वी असला तरी एक कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये स्वतःची छाप पाडण्यात विराट अपयशी ठरला आहे. विराटच्या नेतृत्वात आरसीबीने अद्याप आयपीएलच चषक उंचावलेला नाही. तसेच विराटच्या नेतृत्वात आरसीबीने कधी अंतिम फेरीदेखील गाठलेली नाही. विराट यंदा आयपीएलमध्ये सलामीचा फलंदाज म्हणून मैदानात उतरणार नाही. तसेच आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी विराट आणि त्याची सेना प्रयत्न करताना दिसेल.

डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलवर जबाबदारी

यंदाच्याच वर्षी आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला 14.25 कोटी रुपये देऊन खरेदी केलं आहे. आयपीएलमध्ये सध्या मॅक्सवेल खास प्रदर्शन करताना दिसून येत नाहीय. पण तो काय करु शकतो, हे मात्र क्रिकेट विश्वाला माहिती आहे. ए बी डिव्हिलियर्स हा आरसीबीसाठी हुकमी एक्का आहे. पाठीमागचे काही सिझन एबीने आरसीबीसाठी खेळले आहेत. अनेक यादगार परफॉर्मन्सने एबीने आरसीबीला मॅचेस जिंकवून दिल्या आहेत. यंदाही अशाच मॅचविनिंग खेळीची डिव्हिलियर्सकडून आरसीबीला अपेक्षा असेल.

चहल-जॅमिसनकडे गोलंदाजीचं नेतृत्व

युजवेंद्र चहल हा आरसीबीचा विकेट टेकर गोलंदाज आहे. समोरच्या संघातील बॅट्समन सेट झाला की कोहली चहलला गोलंदाजीसाठी निमंत्रण देतो आणि चहलही विराटची इच्छा पूर्ण करुन संघाला जिंकवण्यासाठी मोलाचं योगदान देतो. यंदाच्या आयपीएल मोसमात चहलकडून शानदार प्रदर्शनाची अपेक्षा असेल. न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज कायले जॅमिसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार थोड्या काळात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. यंदाच्या सिझनमधल्या त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल.

संबंधित बातम्या

IPL 2021: विराट कोहलीच्या RCB ला झटका, सलामीवीराला कोरोनाची लागण

Covid-19 : IPL सामने मुंबईबाहेर नेण्याच्या हालचाली, BCCI मोठा निर्णय घेणार?

(IPL 2021: Aakash Chopra says RCB will not qualify for the playoffs)