IND vs ENG: म्हणून टीम इंडियाचा निराशाजनक पराभव होतोय…जे आर्चरला समजलं ते बीसीसीआयला कळत नाही हेच दुर्दैव; नेमकं काय म्हणाला?

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचे अतिशय खराब प्रदर्शन सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनामागे काय कारण आहे ते पाहा...

IND vs ENG: म्हणून टीम इंडियाचा निराशाजनक पराभव होतोय...जे आर्चरला समजलं ते बीसीसीआयला कळत नाही हेच दुर्दैव; नेमकं काय म्हणाला?
jofra archer on team india
| Updated on: Jul 09, 2026 | 9:49 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. भारतीय संघ आज चौथा सामना खेळत आहे. यापूर्वीच्या सामन्यात भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय वाईट पाहायला मिळाले. भारतीय संघात इतके तगडे फलंदाज असूनही भारतीय संघाला इतका संघर्ष का करावा लागतोय असा प्रश्न पडत आहे. अनेकांनी या संघावर अनेक प्रश्न उपस्थित केले. आता भारतीय संघाला असा निराशाजनक पराभवाचा सामना का करावा लागत आहे यामागचे कारण इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने बोलून दाखवले. फक्त खंत एकच आहे की जे आर्चरला कळू शकते ते भारतीय संघाला का नाही.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघ संघर्ष करत आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात संघाचा डाव अवघ्या 76 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडने हा सामना 125 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. इंग्लंडमधील फलंदाजीसाठीच्या परिस्थिती थोड्या कठीण आहेत, ज्यामुळे भारतीय संघाचे स्टार फलंदाज उघडे पडत आहेत. भारताच्या पराभवानंतर, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आयपीएलच्या सपाट खेळपट्ट्यांवर टीका केली. भारतीय संघाचा डाव 76 धावांवर रोखण्यात जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आर्चरने 3 षटकांत 29 धावा देऊन 3 बळी घेतले, तर टंगने 28 धावा देऊन 4 बळी घेतले. भारताने पहिल्या 5 षटकांत 5 गडी गमावले.

जोफ्रा आर्चर आयपीएलबद्दल काय म्हणाला?

पत्रकार परिषदेत जोफ्रा आर्चर म्हणाला की, “इंग्लंडमध्ये गोलंदाजी करताना चेंडू योग्य रेषेवर आणि टप्प्यावर ठेवणे अधिक महत्त्वाचे असते, परंतु भारतातील परिस्थिती वेगळी आहे. इथे तुम्ही चांगल्या लेंथवर सरळ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करता. पण तिथल्या खेळपट्ट्या फलंदाजांसाठी अधिक अनुकूल आहेत आणि सीमा लहान आहेत. त्यामुळे तिथे तुम्हाला तुमच्या गोलंदाजीत खूप अचूक राहावे लागते.

जोफ्रा आर्चरच्या मते, “इंग्लंडमध्ये गोलंदाजांना चुकांसाठी थोडी अधिक संधी असते, तर आयपीएलमध्ये एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. कधीकधी आयपीएलमध्ये 200 धावासुद्धा सुरक्षित नसतात. त्या खेळपट्टीवर 200 धावा केल्यानंतर, आम्ही पूर्णपणे आत्मविश्वासात होतो असे मी म्हणणार नाही, पण मला वाटले की या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी एका विशेष खेळीची गरज लागेल.”

भारतीय संघाने मार्चमध्ये टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर आयपीएल झाली. आयपीएलनंतर, संघाने या फॉरमॅटमधील आपली पहिली मालिका आयर्लंडमध्ये खेळली. आयर्लंडने दोन सामन्यांची मालिका जिंकली. इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि संघ पुढील दोन सामने हरला. पाच सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.

Follow Us