AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा

ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा

| Updated on: Jul 09, 2026 | 11:04 AM
Share

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी केलेले एक विधान राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी सत्ताधारी पक्षावर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. इतकेच नाही तर त्यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबतही सविस्तर मत मांडले.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी केलेले एक विधान राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी सत्ताधारी पक्षावर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. इतकेच नाही तर त्यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबतही सविस्तर मत मांडले.

राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सुलतानासारखे वागतात, मुघलांच्या काळातील सुलतान असेच होते. ते दहशत माजवायचे आणि जनतेचा पैसा खिशात घालायचे. असंच झालं, एक मोठा प्रकल्प करायचा, त्यातले निम्मे पैसे खिशात घालायचे आणि हा प्रकल्प जेव्हा कोसळतो, तेव्हा आवाज उठवणाऱ्या जनतेला ‘भाडे के ट्टू’ म्हणायचं. एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसाठी आणीबाणीची परिस्थिती आणली आहे, जनतेला बोलूच द्यायचे नाही.” पुढे संजय राऊतांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबतही मत व्यक्त केले.

Published on: Jul 09, 2026 11:04 AM

Follow Us