मुंबई : आजपासून बरोबर तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारताने चौथ्यांदा अंडर 19 ( Under 19 World Cup) वर्ल्ड कप जिंकला होता. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला (ind Vs Aus) आठ गड्यांनी पराभूत केले. ही मॅच 3 फेब्रुवारी 2018 रोजी माउंट मौनगुनी येथे झाली होती. दणदणीत शतक ठोकून मनजोत कालरा (manoj kalra) हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता. परंतु मॅच संपल्यानंतर काही दिवसांनंतर मनोज कालराने त्याच्या वयात फेरफार केल्याचं समोर आलं होतं. (Manoj Kalra Century in under 19 World Cup Against Australia On 3 Feb)
वयात फेरफार केल्याने साहजिक त्याचं वय 19 वर्षाखालील असल्याचं त्याने भासवलं. यामुळे त्याला अंडर 19 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये दिल्ली पोलिसांनी मनजोतच्या आई वडिलांवर मनोजच्या वयात फेरफार केल्याचा आरोप ठेवला. यामुळे मनजोतला एका वर्षासाठी रणजी ट्रॉफी खेळता आली नाही.
अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 217 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल भारताच्या मनजोत कालराने दणदणीत शकत ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या खेळीमध्ये त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मनजोत पाटवा बॅटसमन ठरला. भारताने ही मॅच 39 व्या ओव्हरमध्येच जिंकली.
अंडर 19 चा अंतिम सामना झाल्याच्या एका वर्षाने मनजोतने विश्वचषक खेळण्यासाठी त्याच्या वयात फेरबदल करुन घेतल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. चौफेर आरोपानंतर बीसीसीआयने त्याची चौकशी केली. बीसीसीआयच्या चौकशीत तो निर्दोष सुटला परंतु दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात तो अडकला. मनजोतच्या आई वडिलांनी त्याचं वय कागदोपत्री एक वर्ष कमी दाखवलं होतं.
या झालेल्या प्रकारानंतर बीसीसीआयने त्याच्यावर एक वर्ष रणजी खेळण्याची बंदी आणली होती. अंडर 19 चा कोच राहुल द्रविडने या पार्श्वभूमीवर तडक भूमिका घेत हा गंभीर गुन्हा असल्याचं म्हटलं होतं.
(Manoj Kalra Century in under 19 World Cup Against Australia On 3 Feb)
हे ही वाचा :