Mohammad Shami: ‘वंदे मातरम’ गीतावर मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य, जे म्हणाला ते प्रत्येक मुस्लिमाने एकदा ऐकावं

आता शमी चर्चेचा विषय बनला आहे. शमीची एक मुलाखत सध्या खूपच गाजत आहे. शमीने एका मुलाखतीत केलेले विधान आता खूपच व्हायरल होत आहे. मोहम्मद शमीला वंदे मातरम या देशभक्ती गीतावर एक प्रश्न विचारण्यात आले होते. 

Mohammad Shami: वंदे मातरम गीतावर मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य, जे म्हणाला ते प्रत्येक मुस्लिमाने एकदा ऐकावं
| Updated on: Aug 05, 2026 | 10:12 AM

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. अनेक क्रिकेट तज्ञांच्या मते, त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. शमी देशांतर्गत सामन्यात वारंवार चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अनेक वेळा त्याच्या कामगिरीमुळे तो भारतीय संघात पुनरागमन करेल असं म्हटलं जाते, पण संघ जाहीर झाल्यानंतर शमीचे नाव नसते. शमी सध्या आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यात खेळताना दिसतोय. आता शमी चर्चेचा विषय बनला आहे. शमीची एक मुलाखत सध्या खूपच गाजत आहे. शमीने एका मुलाखतीत केलेले विधान आता खूपच व्हायरल होत आहे. मोहम्मद शमीला वंदे मातरम या देशभक्ती गीतावर एक प्रश्न विचारण्यात आले होते.

शमी ‘वंदे मातरम’ संदर्भातील आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शमीला विचारण्यात आले की, ‘वंदे मातरम’ म्हणण्यावर त्याचा काय आक्षेप आहे. शमीने उत्तर दिले की,” कोणालाही यात काही अडचण नसावी. त्यामुळे तो व्यक्ती काही बदलणार नाही.” शमीला विचारण्यात आले की, जर कोणी ‘वंदे मातरम’चा आदर केला नाही, तर त्याला 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. ‘वंदे मातरम’ गाण्यावर किंवा पठण करण्यावर तुमचा काही आक्षेप आहे का?” यावर उत्तर देताना शमी म्हणाला, “यात एवढं काय मोठं आहे? मी बदलणार नाही. आमच्या धर्मात आणि श्रद्धेत आहे की, जर तुमच्या सरकारने एखादा नियम लागू केला, तर त्याचे पालन करणे हा तुमचा हक्क आहे. धर्म किंवा जात याने काही फरक पडत नाही.”

शमी ‘जय हिंद’वरही बोलला का?

शमी पुढे म्हणाला, “कोणी म्हणतं की ‘जय हिंद’ म्हणायला अडचण आहे. कोणाला अडचण आहे? मला नाही वाटत की काही अडचण असायला हवी. आज मी ‘भारत माता की जय’ म्हटलं तर त्यात काय हरकत आहे? ते माझ्या देशाचं नाव आहे. मी फक्त एवढंच म्हणतो की, या गोष्टींमध्ये काय फरक पडतो?” शमी म्हणाला, “माझ्यासोबत असं अनेकदा घडलं आहे. दादा, मी कोणाला घाबरत नाही. आता, जेव्हा मला भीती वाटते, तेव्हा मी स्वतःशीच विचार करतो की माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटेल. एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं सरकार आणि नियम जे काही सांगतात त्याचं पालन करायचं. त्यात अडचण काय आहे?”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us