Shreyas Iyer: संघातील खेळाडूंवर अतिरिक्त दबाव…कॅप्टन श्रेयस अय्यरनं गंभीरबद्दल केलं विधान
IND vs AFG T20 Series: भारत अफगाणिस्तान यांच्यात टी-२० मालिकेला आता आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने गौतम गंभीरबद्दल एक विधान केले आहे.

IND vs AFG T20 Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांची मालिका असणार आहे. आता या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने पत्रकार परिषदेत हजेरी लावली. पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दल एक विधान केले आहे.
श्रेयस अय्यर म्हणाला की, “खेळाडूंना सांभाळण्याच्या आणि त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याच्या त्यांच्यात क्षमता आहे. २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससोबत असताना त्याने हा गुण जवळून अनुभवला. ते संघात खूप विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करतात. प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका आणि जबाबदारी स्पष्टपणे समजलेली असते. प्रशिक्षणात या सर्व खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत.”
तो म्हणाला की, “गंभीर यांची खेळाडूंशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधण्याची आणि त्यांना सांभाळण्याची पद्धत उत्कृष्ट आहे. स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तसतसे प्रत्येक खेळाडूशी असलेले हे नाते महत्त्वाचे ठरेल. आपण सर्व आपापल्या परीने वेगळे असतो आणि तुम्हाला खेळाडूला समजून घेणे आवश्यक आहे. मी त्याच्यासोबत यापूर्वी केकेआरमध्ये काम केले आहे, त्यामुळे तो कसा विचार करतो आणि त्याचा दृष्टिकोन काय असेल हे मला नक्कीच समजते.”
आपल्या कर्णधारपदाबद्दल बोलताना अय्यर म्हणाला की, “संघातील खेळाडूंच्या भूमिकेबद्दल त्याला त्यांच्यावर अतिरिक्त दबाव टाकायचा नाही. त्याऐवजी, टी-२० क्रिकेटच्या गरजांना अनुरूप अशी खेळाची समज खेळाडूंनी विकसित करावी, अशी त्याची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या खेळाडूला सांगता की संघात ही त्याची भूमिका आहे, तेव्हा त्याच्यावर खूप दबाव येतो. त्याऐवजी, जर तुम्ही म्हणालात की संघाला या विशिष्ट भूमिकेत त्याची गरज आहे, तर खेळाडूला महत्त्वाचे आणि मौल्यवान वाटते.”
आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. सामना ७.३० वाजता सुरु होणार असून नाणेफेक हे ७.०० वाजता होईल, भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आता कोणाला जागा मिळते हा पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.