AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Squad for West Indies Test : वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, तिघांचा पत्ता कट

India Test Team Vs West Indies : वेस्ट इंडिज विरुद्ध दोन टेस्ट मॅचच्या सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिल पहिल्यांदा मायदेशात खेळल्या जाणाऱ्या मालिकेत टीमच नेतृत्व करताना दिसेल. सीरीजची सुरुवात 2 ऑक्टोबरपासून होणार आहे.

India Squad for West Indies Test : वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, तिघांचा पत्ता कट
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Sep 25, 2025 | 1:19 PM
Share

India Squad for West Indies Test :वेस्ट इंडिज सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. कॅप्टनपदी शुबमन गिल कायम आहे. रवींद्र जाडेजाला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. सरफराज खानला टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. देवदत्त पडिक्कलने टीम इंडियात पुनरागमन केलय. मोठी बातमी ही आहे की, करुण नायर, साई सुदर्शन, आकाशदीप यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. करुण नायर, साई सुदर्शन इंग्लंड सीरीजमध्ये फ्लॉप ठरले होते. चार कसोटी सामन्यात ते फक्त एक अर्धशतक झळकवू शकले होते विकेटकीपर ऋषभ पंत फिट नाहीय. म्हणून त्याच्या जागी नारायण जगदीशनचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेलने सुद्धा टीममध्ये पुनरागमन केलय.

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन टेस्ट मॅचच्या सीरीजला 2 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होईल. दुसरी टेस्ट मॅच दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये 10 ऑक्टोंबरपासून होईल. वेस्ट इंडिजचे कोच डॅरन सॅमी यांनी सीरीज सुरु होण्याआधीच टीम इंडियाला इशाऱ्या, इशाऱ्यात आव्हान दिलं आहे. जर, न्यूझीलंडची टीम भारताला त्यांच्याच देशात हरवू शकते, तर आम्ही सुद्धा तसच करु शकतो.

भारताची टेस्ट टीम : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि नारायण जगदीशन.

वेस्टइंडीजची टेस्ट टीम :  केवरॉन एंडरसन, एलिक अथानाजे, जॉन कॅम्पबल, तेगनारायण चंद्रपॉल, शे होप, टेविन इमलाच, ब्रँडन किंग, रॉस्टन चेज़ (कॅप्टन), जस्टिन ग्रीव्स, खारे पियरे, जॉन वॉरिकन, अल्जारी जोसफ, शेमार जोसफ, एंडरसन फिलिप आणि जेडन सील्स.

भारत-वेस्टइंडीजमध्ये कोणी किती टेस्ट मॅच जिंकल्यात?

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत 100 कसोटी सामने झाले आहेत. भारताने एकूण 23 कसोटी सामने जिंकलेत. वेस्ट इंडिजला 30 मध्ये विजय मिळाला आहे. दोन्ही देशात 47 टेस्ट मॅच ड्रॉ झाल्यात. भारताने वेस्ट इंडिजला सलग 9 टेस्ट सीरीजमध्ये हरवलं आहे. वेस्ट इंडिजच्या टीमने भारतात शेवटची टेस्ट सीरीज 2002 साली जिंकलेली. मागच्या पाच वर्षात तीन टेस्ट सीरीजमध्ये भारताने वेस्ट इंडिजवर क्लीन स्वीप विजय मिळवला आहे.

Follow Us
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.