Virat Kohli: कोहलीशी पंगा घेणाऱ्या निवड समिती कायमची सुट्टी, चाहत्यांनी सोशल मीडियावर केला जल्लोष

| Updated on: Nov 19, 2022 | 12:40 PM

विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विश्रांती द्यायचा विचार बीसीसीआय करीत आहे.

Virat Kohli: कोहलीशी पंगा घेणाऱ्या निवड समिती कायमची सुट्टी, चाहत्यांनी सोशल मीडियावर केला जल्लोष
virat kohli fan
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : T20 विश्वचषक (T20 World cup 2022) स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) खराब कामगिरी केल्यापासून निवड समिती अधिक चर्चेत आली आहे. कारण निवड समितीने दोनवेळा T20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडिया पाठविली होती. परंतु टीममधील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. काल निवड समिती बरखास्त झाल्यानंतर रोहित शर्माची (Rohit Sharma) सुद्धा सुट्टी होणार असल्याची चर्चा आहे.

काल रात्रीपासून विराट कोहलीचे चाहते सोशल मीडियावर आपला जल्लोष साजरा करीत आहेत. त्याचं कारण असं आहे की, ज्या निवड समितीने विराट कोहलीचं कर्णधारपद हटवलं होतं. त्यांची सुट्टी झाल्यामुळे चाहत्यांनी रात्रीपासून जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे.

विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विश्रांती द्यायचा विचार बीसीसीआय करीत आहे. टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे.