
स्मार्टफोन हा आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण त्यावर अवलंबून असतो. त्यामुळे त्याला फुल चार्ज ठेवणं ही आपली गरज बनली आहे. अनेक जण रात्री झोपताना आपला फोन चार्जिंगला लावतात आणि सकाळी पूर्ण चार्ज झालेला फोन वापरण्यासाठी घेतात. ही सवय खूप सोयीस्कर वाटते, नाही का? पण तुम्हाला माहीत आहे का, की तुमचा फोन रात्रभर चार्जिंगला लावून ठेवणं हे तुमच्या फोनच्या बॅटरीसाठी आणि एकूणच फोनच्या आयुष्यासाठी चांगलं नाही? ९०% पेक्षा जास्त लोकांना यामागचं खरं कारण आणि त्याचे संभाव्य धोके माहीत नसतात.
आजकालच्या बहुतेक स्मार्टफोन्समध्ये Lithium-ion बॅटरी वापरली जाते. ही बॅटरी खूप हाय-टेक असते आणि तिची कार्यक्षमताही चांगली असते, यात शंका नाही. पण या बॅटरीच्या काही मर्यादाही आहेत.
अनेक आधुनिक स्मार्टफोन कंपन्या दावा करतात की त्यांच्या फोनमध्ये असा सिस्टीम असतो जो बॅटरी १००% चार्ज झाल्यावर आपोआप चार्जिंग बंद करतो. हे बऱ्याच अंशी खरं असलं तरी, काही तज्ज्ञांच्या मते, चार्जरला फोन जोडून ठेवल्याने बॅटरीवर ‘ट्रिकल चार्ज’ सुरू राहू शकतं किंवा काही प्रमाणात उष्णता निर्माण होतच राहते. त्यामुळे, मॅन्युअली फोन अनप्लग करणं हे नेहमीच जास्त सुरक्षित आणि बॅटरीसाठी चांगलं मानलं जातं.
मग योग्य पद्धत कोणती?
1. तुमचा फोन ९०% ते ९५% चार्ज झाल्यावर चार्जरमधून काढून टाका.
2. शक्य असल्यास, फोन रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नका.
3. फोन २०% च्या खाली जाऊ देण्याआधी चार्जिंगला लावा.
4. चार्जिंग करताना फोनवर जास्त लोड येईल असे काम करू नका.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)