AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ना मोबाईलचं वेड, ना सेल्फी आवड, अशी ‘गॅझेट फ्री’ आई लाभलेली आपली शेवटची भाग्यवान पिढी”, आयएएस अधिकाऱ्याचं पत्र व्हायरल

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांचं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी आईला उद्देशून लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलंय. या पत्रात त्यांनी अश्या पिढीचा उल्लेख केलाय ज्यांची आई गॅझेटच्या दुनियापासून कोसो दूर आहे.

ना मोबाईलचं वेड, ना सेल्फी आवड, अशी 'गॅझेट फ्री' आई लाभलेली आपली शेवटची भाग्यवान पिढी, आयएएस अधिकाऱ्याचं पत्र व्हायरल
| Updated on: May 17, 2022 | 5:15 PM
Share

मुंबई : आईसाठी आपल्या प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. त्याबद्दल अनेकजण उघडपणे आपल्या भावना व्यक्त करतात. तर काहीजण तो हळवा कोपरा कायम आपल्या मनात जपतात. असंच आईविषयी बोलणारं एक पत्र सध्या व्हायरल होतंय. हे पत्र आहे, आयएएस अधिकारी अर्पित वर्मा (IAS Arpit Verma) यांचं. त्यांनी आईला उद्देशून लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय (Viral Latter) बनलंय. या पत्रात त्यांनी अश्या पिढीचा उल्लेख केलाय ज्यांची आई गॅझेटच्या दुनियापासून कोसो दूर आहे. त्यांनी लिहिलंय की ज्यांची आई मोबाईल वापरत नाही, अश्या शेवटच्या पिढीचे आपण सदस्य आहोत. आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला अशी ‘गॅझेट फ्री’ आई (Gadget free Mother) मिळाली आहे.

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांचं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी आईला उद्देशून लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलंय. या पत्रात त्यांनी अश्या पिढीचा उल्लेख केलाय ज्यांची आई गॅझेटच्या दुनियापासून कोसो दूर आहे. त्यांनी लिहिलंय की ज्यांची आई मोबाईल वापरत नाही, अश्या शेवटच्या पिढीचे आपण सदस्य आहोत. आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला अशी ‘गॅझेट फ्री’ आई मिळाली आहे.

आयएएस अधिकारी अर्पित वर्मा यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आईबद्दल हृदयस्पर्शी ओळी लिहिल्या आहेत. या पत्रावर लिहिलं आहे की, “आमची ही शेवटची पिढी आहे, ज्याच्याकडे अशी मायाळू आई आहे. ना तिचं कोणत्या सोशल मीडियावर अकाऊंट आहे, ना तिला सेल्फी घेण्याची आवड आहे. तिला तर हे देखील नाही माहित की स्मार्टफोनचं लॉक कसं उघडलं जातं. तिला तिची जन्मतारीखही नाही माहित. जिने खूप कमी सुखसुविधांमध्या आपलं जीवन जगलं आहे, तेही कुठलीही तक्रार न करता. होय मी त्या पिढीचा सदस्य आहे, ज्यांच्याकडे अशी आई आहे.”, या पत्राची आणि या मजकुराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

अर्पित यांच्या या ट्विटला साडे आठ हजार लोकांनी लाईक केलंय. तर एक हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलंय.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.