Service: 1 ऑ़क्टोबरपासून एकदम सैराट.. कामे होतील सुपर फास्ट..

Service: 1 ऑ़क्टोबरपासून देशातील टेलिकॉम क्षेत्रात क्रांती येणार आहे. त्याचा झंझावात तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे..

Service: 1 ऑ़क्टोबरपासून एकदम सैराट.. कामे होतील सुपर फास्ट..
आता 5G चं वारं
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 25, 2022 | 8:35 PM

नवी दिल्ली : भारतात येत्या 1 ऑ़क्टोबरपासून टेलिकॉम क्षेत्रात (Telecom Sector) क्रांती येणार आहे. त्याचा झंझावात तुमच्या मोबाईलमध्ये (Mobile) जाणवणार आहे.आता आम्ही कोणत्या क्रांतीची गोष्ट करतोय याचा अंदाज तुम्हाला एव्हाना आला असेल. तर देशात 5G चं वारं आलं आहे. त्याची सुरुवात 1 ऑक्टोबरपासून होत आहे.

National Broad Brand Mission ने याविषयीची माहिती ट्विट करुन दिली आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय मोबाईल काँग्रेसमध्ये 5जी सेवा सुरु करणार आहेत. ट्वीट नुसार, डिजिटल ट्रांसफॉर्मेशन आणि कनेक्टिविटीला नवीन आयाम देण्याचा प्रयत्न होणार आहे.

1 ऑ़क्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञानांचा मेळा असणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये 5जी सर्व्हिसचे उद्धघाटन करतील. म्हणजे देशात 5G सेवेचा श्रीगणेशा पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही एका क्रांतीपेक्षा कमी गोष्ट नाही. या सेवेमुळे भारत जगात विकसीत राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसेल.

दूरसंचार विभागाने (DoT) इंडिया आणि सेल्युलर ऑपरेशन्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) यांच्या संयुक्त उपक्रमातून मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात येते. इंडिया मोबाईल काँग्रेस केवळ भारतातच नाही तर आशियातील सर्वात मोठी दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञानाचा मंच असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.

केंद्रीय IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अत्यंत कमी वेळेत केंद्र सरकारने 5जी सेवेचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या 80 टक्के क्षेत्र व्यापण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. उत्तर भारतातून ही योजना मजबूत होईल.

पहिल्या टप्प्यात भारतातील जवळपास 13 शहरात 5जीची सेवा सुरु करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेल एका महिन्याच आतच सर्वदूर 5जीची सेवा सुरु करणार असल्याची चर्चा आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत काही प्रमुख शहरात कंपनी 5जीची सेवा सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे.

तर आघाडीची कंपनी रिलायन्स जिओनेही देशात 5जी नेटवर्कमध्ये छापा सोडण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनीने क्वालकॉम या कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. एवढंच नाही तर कंपनी गूगल क्लाऊड विकसीत करण्यसाठीही प्रयत्न करत आहे.