AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर ‘सावत्र आई’ला पेन्शन मिळते का?

एखाद्या पतीने पहिले लग्न असतानाच दुसरे लग्न केले, तर काय होते? अशा परिस्थितीत, दुसऱ्या पत्नीला किंवा 'सावत्र आई'ला कौटुंबिक पेन्शन मिळते का, हा एक मोठा प्रश्न आहे. याबद्दल कायद्याचे आणि न्यायालयाचे नियम काय सांगतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर 'सावत्र आई'ला पेन्शन मिळते का?
Does a second mother has right to Get a Family PensionImage Credit source: tv9 marathi
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Aug 22, 2025 | 5:00 PM
Share

एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला कौटुंबिक पेन्शन मिळते, पण जर एखाद्या व्यक्तीने दुसरे लग्न केले असेल तर दुसऱ्या पत्नीला किंवा ‘सावत्र आई’ला ही पेन्शन मिळते का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने यावर एक महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. न्यायालयाने ‘आई’ या शब्दाची व्याख्या अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यामुळे सामाजिक कल्याण योजनांमध्ये सावत्र आईचाही समावेश केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दुसऱ्या पत्नीचा पतीच्या मालमत्तेवर अधिकार

सध्याच्या नियमांनुसार, जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत असेल आणि तिचा मृत्यू झाल्यास, तिची दुसरी पत्नी अनुकंपावर नोकरी किंवा कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र नसते. मात्र, तिच्या मुलांना हे सर्व लाभ मिळतात. मुलांच्या बाबतीत, मुलगा सज्ञान होईपर्यंत आणि मुलगी लग्न होईपर्यंत पेन्शनसाठी पात्र असते.

महत्त्वाचा नियम: जर पहिल्या पत्नीच्या हयातीत पतीने दुसरे लग्न केले असेल, तर दुसऱ्या पत्नीला कौटुंबिक पेन्शन मिळत नाही, जरी त्यांचे लग्न कायदेशीर असले तरी.

दुसऱ्या पत्नीला कधी मिळतो कायदेशीर हक्क?

हिंदू विवाह कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले असेल, तर दुसऱ्या पत्नीला कायदेशीर हक्क मिळतात. या परिस्थितीत, दुसऱ्या पत्नीला पतीच्या सर्व मालमत्तेवर हक्क मिळतो आणि तिला कौटुंबिक पेन्शनही मिळू शकते.

घटस्फोट झाल्यास: हीच परिस्थिती घटस्फोटानंतरही लागू होते. जर पतीने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर दुसरे लग्न केले असेल, तर दुसऱ्या पत्नीला ते सर्व अधिकार मिळतात जे एका पत्नीला मिळतात.

आईच्या व्याख्येवर सर्वोच्च न्यायालयाचे भाष्य

अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात एका महिलेने याचिका दाखल केली होती. या महिलेने तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांचे पालनपोषण केले होते. ती कौटुंबिक पेन्शनची मागणी करत होती. तेव्हा न्यायमूर्ती कांत यांनी केंद्र सरकारच्या वकिलाला प्रश्न विचारला की, ‘जर एका महिन्याच्या बाळाच्या आईचे निधन झाले आणि वडिलांनी दुसरे लग्न केले, तर सावत्र आईला खरी आई मानले जाणार नाही का?’

न्यायमूर्ती कांत यांनी स्पष्ट केले की, कायद्याने जरी तुम्ही तिला सावत्र आई म्हणत असाल, तरी तिने पहिल्या दिवसापासून त्या मुलासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे, त्यामुळे ती आईच आहे. त्यामुळे सामाजिक कल्याण योजनांचा लाभ देण्यासाठी ‘आई’ या शब्दाची व्याख्या उदार आणि लवचिक (Flexible) असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!