मुंबईकरांची चिंता मिटली, मात्र एक आठवड्याची वाट पहावीच लागणार? महापालिकेनं का घेतला असा निर्णय
सध्या मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा भातसा, विहार व तुळशी या सात धरणात 74 टक्के पाणीसाठी झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबई, 31 जुलै 2023 | गेल्या आठवड्यात मुंबईकरांसाठी चांगली बातमी आली होती. त्यामुळे मुंबईत राहणारे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला होता. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही धरणं 68 टक्यांपेक्षा अधिक भरली होती. त्यामुळे सध्या सुरू असणाऱ्या पाणी कपातीवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता होती. तर याच आठवड्यापासून पाणीकपात होणार होती. मात्र आता हा लगेच निर्णय होणार नसल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून कळत आहे. सध्या मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा भातसा, विहार व तुळशी या सात धरणात 74 टक्के पाणीसाठी झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणीकपातीबाबत महापालिका प्रशासनाची बैठक होईल त्यात आढावा घेतल्यानंतरच पाणीकपातीवर निर्णय होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता आणखीन एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.
Published on: Jul 31, 2023 08:21 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
